पाटणादेवी
![]() |
पाटणादेवी चंडिका माता |
पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासुन नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ओढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.
मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत्त नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे
वाट्त नाही कही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.
अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातुन भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी
तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पोर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते.
आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणित आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.
देवालयाचा ईतिहास
पुर्वी भारतवर्षातील महाराष्ट विदर्भ, खान्देश भागामध्ये पाटणा (विज्जलगड) प्रांत ऎतिहासिक महत्वाचा होता. येथे पुर्वी यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे राज्य होते. त्यावेळी हे शहर ४-५ मैल लांबी रुंदीचे होते. शहराचे भोवती ऊंच पर्वतीय तट तसेच शहरांमध्ये निसर्ग सौंदर्य वाढविणारी अनेक वॄक्ष-वेली यामुळे हे शहर प्रेक्षणीय होते. शहराचे राजमार्ग विशाल असून दुतर्फा निरनिराळी फळझाडे लावलेली होती.
पर्वताचे ऊंच भागावर पाण्याचे टाके खॊदून नळाद्वारे शहरामध्ये पाणी पुरवठा केलेला होता. शहरामधील धातूच्या खाणी व पर्वतावरील निरनिराळ्या वनस्पतींमुळॆ हे शहर शालिवाहन शक काळापासुनच व्यापार, कला, विद्या, रहदारी व देवस्थान यासाठी खूप प्रसिध्द होते. त्यावेळी यादवांचे मांडलिक राजे यांनी वाघळी येथील सिध्देश्वर मंदिर (शके ९९१) बहाळ येथील शारदादेवी मंदिर (शके १९४४) व पाटणा येथील चंडिकादेवी मंदिर ( शक पुर्व कलिन स्थापना असलेले) शके ११२८ ही देवालये यादवराव खॆऊणचंद्र व गॊविंदराज मौर्य यांनी शके ११५० आषाढ ३० सूर्य ग्रहणावर पितृ स्मृती स्मरणार्थ लोकदर्शनास्तव खुली केल्याचा उल्लेख श्री संत जनार्दनचरित्रामध्ये आहे. त्यावेळी त्यांचे दरबारामध्ये उपमण्यु गोत्री देशपांडे यांचे मूळ पुरुष कृष्णदेव यांचेकडे व्यवस्थापन कार्य होते. त्यांना त्या प्रित्यर्थ चाळीस लहान लहान वाड्यांचे अधिपत्य भूमीसह देऊन देशपांडेपण दिले होते. ते पुढे त्याच ठिकाणी रहिवासाकरिता राहिल्यामुळे तो भाग चाळीसगाव म्हणुन ओळखला जावू लागला.पुढे शके १२१६ चे सुमारास अल्लाउद्दिन खिलजी एलिचपूर देवगिरी ( दौलताबाद ) कडे रामदेवराय यादवास कपटाने जिंकण्यास गेला. एकीकडून गुलबर्गा येथे स्थापन झालेली बहामनी शाही व दुसरीकडून दिल्ली मोगल साम्राज्य यात हा प्रांत अडचणीत सापडला. त्यामुळे पूर्वीच्या हिन्दु राज्याची धर्ममय प्रभावशाली राज्यप्रणाली जावून तेथे इस्लामी धर्मसत्ता शके १२१६ पासून आली. चतुवर्ण व सनातन हिंदू धर्म जर्जर झाला व सर्वत्र एकजात इस्लाम धर्माचे हिरवे निशाण फडकू लागले व हा प्रान्त नामशेष झाला.
चंडिका ( पाटणा) देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. ह्या शक्तिपीठाचे नाव वरदहस्त असे आहे. ह्या शक्तिपीठा संदर्भात कथा अशी आहे की, सतीचे वडील दक्षप्रजापती त्यांनी एकदा पुत्रसंतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. परंतु शिव – सतीस यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. कारण शिव-सतीचा विवाह वडील दक्षप्रजापती यांचे मनाविरुध्द झाला,ह्या विवाहास त्यांची संमती नव्ह्ती. हे एक यज्ञास न बोलविण्याचे मुख्य कारण तसेच शिवजीचे सर्वभक्तगण स्मशाणात राहणारे , चित्रविचित्र पोषाख करणारे, कफल्लक, अंगास भस्म फासणारे त्यामुळे ह्या डामडौलाच्या यज्ञ सोहळ्यात ह्या सर्वांचे प्रयोजन नाही असे कारण दाखवून दक्षप्रजापतीने शिव-सतीस निमंत्रण दिले नाही. भव्य अशा यज्ञ मंडपात यज्ञाची सुरुवात झाली. सर्व देव आपाआपला भाग घेण्यासाठी निमंत्रणाप्रमाणे आले हे पाहून नारदमूनी सतीस जावून भेटले. आपल्या रसभरीत मधुर वाणीने यज्ञाचे वर्णन सतीस ऎकवीले व विचारले की आपण अजून का गेला नाहीत. त्यावर सतीने आम्हास निमंत्रण नसल्याचे सांगितले त्यावर पितागृही भेटीसाठी व यज्ञाचे ठिकाणी दर्शनासाठी कुठ्ल्याही निमंत्रणाची जरुरी नाही हे युक्तीवादाने सतीस पटवून दिले. यज्ञाचे निमित्ताने गेल्यावर सर्वांच्या भेटी होतील. अशी इच्छा सतीने शिवजीस सांगितली. ही वेळ योग्य नाही ही गोष्ट शिवजींनी सतीस समजावीण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीहट्टापुढे तो जमला नाही. म्हणून त्यांनी सतीस एकटीने जाण्यास परवानगी दिली. सती नंदीसोबत यज्ञाचे दर्शनासाठी सर्व प्रथम पितॄगॄही गेली. त्या ठिकाणी जमलेल्या सर्व आप्तगणगोतांनी विनानिमंत्रण तू का आलीस असे हिनवून सतीचा अपमान केला. वादविवाद टाळून हा अपमान सतीने सहन केला. सती पुढे यज्ञमंडपाकडे निघाली तिथे गेल्यावर सर्व देवतेंचे भाग यज्ञपीठावर मांड्लेले सतीने पाहिले. परंतु महादेवाचा भाग त्या ठिकाणी नव्हता असा शिवजीचा अपमान योग्य नाही हे समजाविण्याचे प्रयत्न सतीने केला पण अभिमानाने व गर्वाने धूंध झालेल्या दक्षप्रजापतीस सतीचे म्हणणे पटले नाही. उलट शिवजी तुझे पती आहे त्यामुळे हे तु बोलतेस व त्याने सतीस तू यज्ञमंड्पातून चालती हो असे सांगितले त्यामुळे देवधीदेव महादेवासह आपल्या पतीचा हा अपमान सतीकडून सहन न झाल्यामुळे सतीने आपल्या पित्याकडून निर्माण झालेले शरीर हे य़ज्ञ मंड्पातच संपविण्याचा निश्चय केला. तिने आत्मशक्ती जागृत करुन शरीरातुन प्राण काढून घेतला व ती निष्प्राण झाली ही गोष्ट शिवजीस नंदीने जावून सांगितली. शिवजी खूप क्रोधीत झाले त्यांनी आपल्या जटा आपटून विरभद्र निर्माण केला व दक्षयज्ञाचा विद्ध्वंस केला व सतीचे शव दोन्ही हातात घेवून कैलासाकडे जावयास निघाले परंतु पत्नी वियोगाचे क्रोधामुळे तांडव नृत्य करु लागले. त्यातच त्यांचा तिसरा नेञ उघडला गेला व जो समोर येइल तो भस्म होवू लागला. अश्या ह्या संहारामुळे सर्वांचा विनाश होइल अशी काळजी सर्व देवांना पडली. त्यावळी सर्व देव भगवान विष्णुकडे शरण गेले ह्यावर काही उपाय योजना करावी अशी विनंती केली त्यावेळी भगवान विष्णुंनी क्रोधाचे कारण असलेले शिवजीच्या हातातील सतीचे शव नष्ट करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही हे लक्षात घेवुन आपल्या सुदर्शन चक्राने शिवजीच्या हातातील शवाचे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी त्या शवाचा तुकडा पडला त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले. मंदिरा मागील डोंगरावर भगवतीसतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडल्यामुळे त्या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाले. शक्तिपीठाची मुळ जागा डोंगराच्या उंच कडेवर आहे.भगवतीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी भगवतीची नित्य उपासना केली. वृध्दापकाळाने गात्र शिथील होवु लागले. त्यामुळे उपासनेत खंड पडेल ह्या विचाराने ते चिंतीत झाले. त्यावेळी एक अनुष्ठान त्यांनी केले त्यावेळी भगवतीने त्यांचेवर प्रसन्न होवून दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी भक्तांसाठी व स्वतःकरीत असलेल्या नित्य उपासनेसाठी भगवतीने उंच कडेवरुन खाली यावे अशी विनंती केली. आपल्या परमप्रिय भक्तासाठी ही विनंती मान्य केली. मी तुझ्या भक्तिपोटी तुझ्याबरोबर खाली येइल पण मी मागे येत असताना तु मागे वळून पाहू नये असे सांगितले त्याप्रमाणे भगवती आपल्या परमप्रिय भक्तामागे येवु लागली डोंगरकडा उतरुन आल्यावर गोविंदस्वामी धवलतिर्थ कुंडाजवळ येवून पोहचले व त्यांनी अल्हादकारक जलपान करुन आपली त्रुषा शांत केली पुढील मार्गक्रमणास सुरुवात करते वेळी त्यांना भोवळ आली व त्यातुन सावरताच त्यांना खूप मोठा कर्कश आवाज ऎकु आला. त्यामुळे ते भांबावून गेले व भगवती आपले मागे आहे किंवा नाही भान विसरुन त्यांनी मागे वळून पाहिले त्यावेळी भगवतीने त्यांना दर्शन दिले व त्याच ठिकाणी भगवती अदॄश्य झाली. घडल्या प्रकाराचे त्यांना खूप वाइट वाटले. पण ते दॄढ निश्चयाने ते त्या ठिकाणी मरणांत अनुष्ठानास बसले शेवटी भगवतीने त्यांना पुन्हा दर्शन दिले व सांगितले की मी तुझ्या मागे येणार नाही. तर तुला दिलेल्या वचन पुर्तीसाठी तू या कुंडात स्नान कर, स्नान करतेवेळी तुझ्या हातात स्वयंभू मुर्ती येइल ती तू घे व माझी स्थापना कर, अश्या रितीने स्नानानंतर गोविंद स्वामीच्या हातामध्ये पाषाणाची स्वयंभू मुर्ती आली. त्याच मुर्तीची स्थापना गोविंद स्वामींनी आजच्या चंडिकादेवी मंदिरात त्यावेळी केली.ह्याच मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिवमंदिर आहे. मध्यभागी विष्णू मंदिर आहे. तसेच गोविंद स्वामींनी आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड निरंतर भगवतीची सेवा केली व सेवा करत असतानाच वचन पुर्तीसाठी जिवंत समाधी घेतली त्यांची समाधी आज मंदिराचे पुढे आहे.
आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे वाटत नाही काही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.
अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातून भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवराञ महोत्सव व वासंतीक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पौर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते. भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या उद्देशपुर्तीसाठी प्रतिष्ठाण प्रयत्नशील असते. दर पोर्णिमेस प्रतिष्ठाणांमार्फत महाप्रसाद वितरण माध्यान्य कालीन पूजेनंतर केला जातो. तसेच न्यासाने यात्रीनिवास बांधण्याचे काम सुद्धा हाती घेतले आहे. आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणीत आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.
प्रेक्षणीय स्थळे
नागार्जून कोठी
![]() |
नागार्जुन कोठी |
या लेण्याचा आकार प्रमाणबध्द नसुन व्हरांडा १८ फुट लांब, ६ फुट रुंद आहे. यास काही चौकोनी तर काही खांब षटकोनी आहेत.लेण्यासमोर एक खांब असुन त्यास सतीचा खांब अशी संज्ञा आहे. मूल होण्यासाठी चंडिकादेवीचे दर्शन घेउन नागार्जुन येथील सतीच्या खांबाजवळ नवस बोलला जातो व इच्छा पूर्तीनंतर त्या नवसाची सांगता देवीजवळ केली जाते. या खांबाची उंची सहा फूट आहे. आतील सभामंडप २० फूट * १८ फूट आहे. मध्यभागी दोन नक्षीकाम केलेले सुशोभित खांब आहेत. खांबाच्या दर्शनी भागावर अंबा व इंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.सभागृहाच्या आतील समोरील भिंतीला लागून कमळावर ध्यानस्थ बसलेल्या महावीरांची मूर्ती आहे. दोन्ही बाजुस दोन दिगंबर तीर्थकारांच्या मुर्त्या आहेत. वरच्या बाजूस दोन चौरी धारी सेवक आहेत. मकर व छत्र कोरलेले आहे. याच सभागृहाच्या पुर्वेकडील भिंतीवर एक ६ फुट उभी मुर्ती आहे हिच मुर्ती नवसाला पावते असा लोकांचा विश्वास आहे.
धवलतीर्थ
धवलतीर्थ
पाटणादेवी मंदिराजवळुन १ कि.मी. अंतरावर पायवाटेने गेल्यावर धवलतीर्थ हा धबधबा आहे. पावसाळ्यात उंचावरुन पडत असलेल्या पाण्याचे दृश्य खुपच मनमोहक असते. ह्याच ठिकाणी देवीचे आद्दउपासक गोविंदस्वामी यांना देवीचा साक्षात्कार झाला. देवीच्या पौराणीक कथेप्रमाणे देवी ह्याच ठिकाणी अदॄश्य झाली म्हणुनच आजही कुळाचारात अनेक भक्त पूजेसाठी येथे येवून देवीचे स्मरण करुन देवीचा तांदळा येथुनच घेवुन जातात.
पितळखोरा लेणी
पितळखोरा लेणि
पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्या आहेत.
उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.
महादेव मंदिर
![]() |
महादेव मंदिर |
केदारकुंड व केदारेश्वर
केदारकुंड व केदारेश्वर
पाटणादेवी मंदिराजवळून २ के. मी.अंतरावर घनदाट झाडीमध्ये पायवाटेने चालत गेल्यावर बर्याच उंचावरुन पाणी पडत असल्याचे दॄश्य पावसाळ्यात दिसते. ज्या ठिकाणी हे पडलेले पाणी साचते तीच जागा म्हणजे केदारकुंड पाणी पडतेवेळी चे दृश्य मनाला आनंद देणारे व अल्हादकारक असते. येथूनच पुढे काही अंतरावर केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पुर्वी बुजले गेले होते. मद्रासी बाबा नावाच्या साधुने ते मंदिर माती काढुन मोकळे केले. जवळच पाण्याचे एक कुंड असुन त्यास नॆसर्गिक अश्या पायर्या आहेत. त्या ठिकाणी गणपतीची एक मुर्ती आहे ह्या गणापतीस उभा गणपती असे संबोधले जाते. ह्याच ठिकाणी मद्रासी बाबांनी मनःशांतीसाठी वसती केली. असे हे ठिकाण मनःशांतीसाठी उत्तम आहे.
महान गणिती भास्कराचार्य
![]() |
भास्कराचार्य
|
या महान गणितीचे आजचे पाटणादेवी हे जन्मस्थान आहे. अंदाजे इ.स.१११४ ते इ.स.११८५ हा त्यांचा कालखंड आहे.
![]() |
शून्याचा अविष्कार करणारे थोर गणिती श्री भास्कराचार्य |
जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, ते ठिकाण औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत आणि चाळीसगाव तालुक्यात पाटणादेवी या जागी आजही त्यांच्या नावाचा शिलालेख आहे.
वालझिरी
पाटणादेवी येथुन चाळीसगावकडे जाणार्या रस्त्यावर तपस्वी ॠषी वाल्मिकी यांचे मंदिर आहे. तेथून जवळच असलेल्या रांजणगावाजवळ घाटातील रस्त्यावर वाल्मिकी (वाल्या कोळी) वाटमारी करीत होते व सध्या असलेल्या मंदिराजवळील नदी किनारी त्यानी खडतर तपश्चर्या करुन पापमुक्ती केली होती. सध्या हे ठिकाण वालझिरी नावाने प्रसिध्द आहे. येथे महाशिवरात्रीचे वेळी मोठी यात्रा भरते.
शॄंगार चावडी
![]() |
शॄंगार चावडी |
वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर
![]() |
वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर |
पाटणादेवी परिसर आज गौताळा अभयारण्यात जोडला गेला आहे. त्या ठिकाणी बिबटे, तडस, लांडगे,ससे,कोल्हे,मोर, माकड, रानडुकर व वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी व बिनविषारी सापांच्या जाती आहेत. ह्या सर्व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने अनेक कामे हाती घेतलेले आहेत. तसेच येथील परिसराच्या माहितीसाठी एक निसर्ग शिक्षण केंद्र चालु केले आहे.
॥ पाटणादेवीची आरती ॥
पाटणके चंडिके तुझा रहिवास डोंगरी हो।
नाना परीच्या वल्ह्या शोभा देती निरंतरी हो।
जाई जुई शेवंती प्रिती मोठी पुष्पावली हो।
दिवट्यांचे कल्लोळ आपण खेळे महाकाली हो।
आदिनाथ योगिनी चंडिका पाटण के स्वामिनी हो।
पर्वतावलोकनी भक्ता अभयवर देऊनी हो॥१॥
पितांबर नेसुनी पद्मासनी बैसली हो।
अंगीची काचोळी केशर बुक्क्यांनी भाळली हो।
वैजयंती हार गळा मोतीयाची जाळी हो।
नाकीचे सुपान चरणी घागरीया लोळती हो॥२॥
विप्रकुली जन्म झाला तैसा अवतार धरीला हो।
भक्तांचा देह अंश तिने उद्धरीला हो।
भक्ती तिचा देह विष्णू लोका प्रती गेला हो
भ्क्तांकित अभिमानी विष्णु दासाची माउली हॊ ॥३॥
चुनगच्ची मंदिर दुरुनी दिसतसे शिखर हो।
ध्यानस्थ बैसले ॠषी ब्राह्मण थोर थोर हो।
तीर्थाचा महिमा धवल तीर्थ उदक स्थिर हो।
ब्राम्हण सोडती मंत्र अक्षदा भक्त गर्जती जयजयकार हो॥४॥
॥ नित्योपासना ॥
॥ श्री देवीचा ध्यानमंत्र ॥
ॐ ऎं ह्रिं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥ (श्री चंडिकादॆव्यै नमो नमः)
ॐ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ सधिके ॥ शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते॥
ॐ नमो दॆव्यै महादॆव्यै शिवायॆ सततं नमः। नमः प्रकॄतै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् ॥
॥ श्रीसूक्तम् ॥
श्री गणेशाय नम:॥ श्रीमहाकालीमहालक्ष्मी महासरस्वती देवाताभ्यो नम:।
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ-वह॥१॥
तां म आ-वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥
अश्व्पूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्। श्रियं देवीमुपह्र्ये श्रीर्मां देवीर्जुषताम् ॥३॥
कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्। पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपव्ह्यये श्रियम् ॥४॥
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्देऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्व:। तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्याऽअलक्ष्मी:॥६॥
उपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिंना सह। प्रादुर्भूतोसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृध्दिं ददातु मे॥७॥
क्षृप्तिपासामलां ज्येष्ठांअलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृध्दिं च सर्वां निर्णुद्द मे गृहात ॥८॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्। ईश्वरीं सर्वभूतांनां तामिहोपव्हये श्रियम् ॥९॥
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि। पशूनां रुपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥
कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम । श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
आपः सृजन्तुस्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे । नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पदमालिनीम्। चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥
आर्द्रां यः करीणीं यष्टिं सुवर्णां हेमेमालिनीम्। सूर्यां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥
तां म आवह जात वेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम्॥१५॥
यः शुचि. प्रयतो भूत्वा जुहूयादाज्यमन्वहम्। सूक्तं पन्चशर्चं च श्रीकामः सततंजपेत॥१६॥
पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे। तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्य लभाम्यहम्॥१७॥
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने। धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे॥१८॥
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायतांक्षी। विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि संन्निधत्स्व॥१९॥
पुत्रपौत्रं धन धान्यं हस्त्यश्वादि गवे रथम् प्रजानां भवसी माता आयुष्यमंतं करोतु मे॥२०॥
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः। धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणोधनमश्विणौ ॥२१॥
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृंत्रहा। सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः॥२२॥
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्॥२३॥
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुककगंधमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवभूतिकरी प्रसीद मह्यम॥२४॥
विष्णु पत्नीं क्षमांदेवीं माधवीं माधवप्रियाम्। लक्ष्मी प्रियसखीं देवी नमाम्यच्युतवल्लभाम्॥२५॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥२६॥
श्रीवर्चस्वमायुऽमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥२७॥
Very good
ReplyDelete