संदर्भ- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ यांच्या अलख निरंजन १९७६ मधून
कुंडलिनी योग-
आध्यात्मिक वाङ्मयाच्या वाचकास व साधकास कुंडलिनी हा शब्द अगदी परिचित असाच आहे.
कुंडलिनी शक्तिची जागृती ही साधने फार महत्वाची आहेत
म्हणून आपली कुंडलिनी जागृत व्हावी म्हणून सर्व साधक घडपड करीत असतात.
कित्येक साधकांनी मला प्रश्न विचारले की, कुंडलिनी शक्ति जागृत होते म्हणजे काय होते?
ही शक्ति कोठे असते ?
ही शक्ति खर काय आहे ?
असे अनेक प्रश्न, उपप्रश्न साधक विचारीत असतात.
सारांश, साधकाला ह्या कुंडलिनीच्या प्रभावाची जाणीव असते व त्या प्रमाणे आपल्या जीवनांत असं काही घडाव अस वाटतं.
काही पुस्तकांत महात्म्यांच्या संतांच्या चरित्रांतील कुंडलिनी जागृतीची प्रकरणं वाचून स्वतःच औत्सुक्य वाढवून घेतात.
व ही शक्ति काय आहे हे जाणून घेण्याची धडपड करतात.
नाथपंथातील कुंडलिनी
नाथपंथांत कुंडलिनी हा स्वतंत्र विचार नसून हठयोग म्हणजेच कुंडलिनी योग असा आहे.
कारण हठयोगाचे उद्दिष्ट सामरस्य हे आहे आणि तेच उद्दिष्ट कुंडलिनीच हठयोगांत आहे.
कुंडलिनी योग स्वतंत्र म्हणून योग प्रकरणांचा विचार हठयोगांत नाही.
हठयोगांत शिवशक्ति सामरस्य हे लक्ष असल्यामुळे शक्तिचे स्वरूप निश्चितपणे त्यांना ज्ञात होते हे स्पष्ट आहे.
(दिव्यामृत धारा-पृष्ठ ३९८ प. पू. जोशी
महाराज, आर्वीकर )
कुण्डलिन्यां समुद्भता गायत्री प्राणधारिणी
प्राणविद्या महाविद्या यस्तां वेत्ति स वेदवित् ।।४६॥
-गोरक्षपद्धती
(भावार्थ : कुंडलिनी महाशक्तितून निर्माण होत असते तसेच प्राणवायु धारण करणारी ही अजपा गायत्री आहे !
जीवात्म्याची शक्ति प्राणविद्या स्वरूपहि हेच आहे आणि ह्याच कारणामुळे ह्या कुंडलिनीला महाविद्यापन म्हणतात.
जो योगी ह्या शक्तिला जाणतो तोच अभ्यासाचे तात्पर्य जाणतो.)
वरील श्री गोरक्षांच्या उक्तीवरून हे स्पष्ट होते की हठयोगी हा कुंडलिनीचा अभ्यास जाणतो व त्या अभ्यासाचें खरे मर्म हे प्राणायामांत आहे.
ह्या नाथपंथ योगशक्तीच्या अभ्यासानेंच (जागृतीने ) हठयोग साध्य होतो.
कुण्डलिनीचा आकार
ह्या कुंडलिनीचा आकार कसा आहे, ती कशी आहे व शरिरात ती कोठे वास करून रहाते असे अनेक प्रश्न या कुण्डलिनी योगांत संभवतात.
ही कुंडलिनी शरीराच्या मर्मस्थानांत चक्राच्या आकाराची असंख्य नाड्यांच्या आश्रयाने आंत्रवेष्टनिका नाम नाडी आहे.
कन्दोर्ध्व कुण्डली शक्तिरष्टधा कुण्डलाकृतिः।
ब्रह्मद्वारमुखं नित्यं मुखेनाच्छाद्य तिष्ठति ॥
-गोरक्षपद्धति : ४७
ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायांत ज्ञाननाथ म्हणतात,
"तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी।
अधोमुख सर्पिणी । निजेली असे ॥ २३ ॥
विद्युल्लतेची विडी । वन्हि ज्वाळाच्या घडी।
पंधरेयाची चोखडी। घोटीव जैशी ॥ २४ ॥
तैशी सुबुद्ध आटली । पटी होती दाटली ।
ते वज्रासने चिमुटली | सावध होय ।।२५॥
केशराने न्हालेले नागाचे पिलू वेढे घालून जसे निजावे त्याप्रमाणे नेमकी साडे तीन वेढ्यांची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली असते.
ती नागीण ज्याप्रमाणे मुर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे, त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभी जवळच्या संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते.
ह्या संदर्भात ज्ञाननाथानं कुंडलिनी विजेची वेटोळी असते असे केले आहे.
ही शक्ति देव, असुर, मनुष्य, खग, चक्र, मृग, कीटकादित असते.
कुंडलिनी ही महाशक्तिचेच स्वरूप आहे व त्यांत पृथ्वी व पाणी तत्वांचा अंश आहे.
कुंडलिनीची जागृती
ह्या कुंडलिनी शक्तिची जागृती प्राणायामाने होते असे अनुभवी प्रमाण आहे!
नित्यनियमित प्राणायाम केल्याने कुंडलिनीची जागृती होते.
विशेषतः हठयोगी कुंभकाच्या अभ्यासाने कुंडलिनी लवकर जागृत होते असे अनुभवास आले आहे.
राजयोगपदं चापि लभते नात्रसंशयः
कुंभकात्कुंडली बोधः कुंडली बोध तो भवेत ॥ ५॥
गोरक्ष पद्धति प्र-७६.
(भावार्थ : अशा विधीनें निस्संदेह राजयोगपद प्राप्त होते.
कुंभकाच्या अभ्यासाने आधार शक्ति कुंडलिनीचा बोध होतो.)
श्री गोरक्षनाथांनी आपल्या गोरक्ष पद्धतीत हेच म्हटले आहे की कुंभकाच्या अभ्यासानेच कुंडलिनी शक्ति जागृत होते.
ही शक्ति जागृत होताच तो क्रियावती, वर्णमयी, कलात्मा व वेधमयी होते.
ह्या कुंडलिनींच्या जागृतीनेच षटचक्र दर्शन होते.
कुंडलिनी जागृतीची लक्षणे
कुंडलिनीची जागृती योगाभ्यासाने होते त्यावेळी खालील लक्षणे जागृतीच्या वेळी असतात.
१) साधक जर स्थिर आसनाने बसून जपध्यान करीत असेल तर त्याचे बाह्यज्ञान काही काळाने आपोआप बंद होते व केवळ कुंभक तयार होतो.
२) साधक स्थिर आसनाने ध्यानावस्थेत असता भ्रुमावर जर एकाग्रता करीत असेल तर बुबळ आपोआप हलू लागतात त्यावेळी बाह्मज्ञान बंद होते व कुंभक तयार होतो.
मन शांत होते.
३) साधक स्थिर आसनाने ध्यानावस्थेत असता कुंडलिनी जाग्रुत झाली असता, षट्चक्राच्या ठिकाणी बारीक कंप होऊन तो कंप वरवर जात असल्याच्या संवेदना होतात.
४) ध्यानामध्ये अचानक प्रणवाचा जप चालू होतो व तो स्पष्ट ऐकू येतो.
५) ध्यानावस्था घेतली असता काही वेळा डोळे जड होतात.
बाह्यज्ञान नाहिसे होते, मन शांत होते, शरीरांतून गरम प्रवाह वहात असल्याचा भास होतो व शरीर गरम होते.
६) ध्यानावस्था घेतली असता काही वेळा मेरूदंडात कंप होतो व शरीराचे भान हरपले जाते.
७) काही वेळा प्राणायाम आपोआप चालू होतो व सुगंधी वास येतो.
८) शरीर कधी जड होते.
सुन्न होते.
देहभान रहात नाही.
काही आवाज ऐकू येतात.
९) कांहीं वेळा निरनिराळी चित्रे व प्रसंग तसेच देवतांचे आकार समोर ध्यानात येतात.
१०) कांहीं अचानकपणे नृत्य गायनादि प्रकार करू लागतात.
अशा अवस्थेतहि कुंडलिनी जागृत होते.
वर सांगितलेली कारणे कुण्डलिनी जागृत होत असतांना साधकाजवळ आढळतात.
साधकाने नियमित प्राणायाम केल्यास कुंडलिनी जागृत होते.
गुरुकृपेने कुंडलिनी जागृति
नाथ पंथांत असा एक संकेत आहे की कुंडलिनी ही गुरूच्या कृपेनेच जागृत होते. केवळ गुरुच्या अमृत दृष्टीने कुंडलिनी जागृत होते.
केवळ कुंभकानेच खरी कुंडलिनी जागृत होते असा नाथपंथाचा सिद्धांत आहे आणि केवळ कुंभक गुरुकृपेने होतो हा नाथ संकेतच आहे.
गुरोर्यस्य प्रभावेण सिद्ध केवल कुम्भके ।।
यदि किं करणैर्मुद्रा बन्धनैरेव मादिभिः ।।५२
-शिवयोग सार:
नाथपंथी गुरुच्या कृपेने सहजगत्या कुंडलिनी जागृत होते.
म्हणून शक्तिपाताने कुंडलिनी जागृत करावी लागली नाही.
पण काही प्रसंगी शक्तिपातानेहि शिष्याची कुंडलिनी जागृत करीत.
श्री गोरक्षनाथाने माणिक शेतकर्याची व चौरंगीनाथाची कुंडलिनी अशाच शक्तिपाताने जागृत केल्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
कुंडलिनी जागृती
कुंडलिनी जागृत झाली असता ती शक्तिमान होते व कार्यशील होऊन यौगिक साधनेत असाधारण अवस्था प्राप्त होते.
कुण्डलिनी जागृत झाली असता अजपा सुरू होतो तोच सूक्ष्म वेद आहे व ह्या सूक्ष्म वेदाचा लाभ घेणं म्हणजेच अध्यात्मातील खरी अनुभूती आहे!
कुटिलांगी कुंडलिनी भुजंगी शक्तिरीश्वरी।
कुंडल्या रुंधती चैते शब्दाः पर्याय वाचकाः
-हठयोग प्रदीपिका: पृ. १०७
अशा जागृत कुंडलिनी शक्तिला कोणी कुंडलिनी, भुजंगी, शक्ति, ईश्वरी, कुंडली, अरूंधती अशा सात शब्दानं संबोधतात.
ह्या जागृत झालेल्या कुंडलिनीने ब्रह्म लोकाची प्राप्ती होते.
व मोक्षपद मिळते.
उद्घाटयेत्कपाटं तु तथा कुंचि कया हठात् ।
कुंडलिन्या तथा योगी मोक्षद्वारं विभेदयेत् ॥
अशा ह्या कुंडलिनी शक्तिच्या हातीच योगाचे तंत्र आहे असे हठयोग प्रदिपिकेंत म्हटले आहे.
हिच्या जागृतीनेच योगी असाधारण होतो.
कंदोर्ध्व कुंडली शक्तिः सुप्ता मोक्षाय योगिनाम्
बंधनायच मढानां यस्तां वेत्तिस योगवित्
कुंडलिनी शक्ति जागृत होऊन मुलाधारांतून सरळ रुद्रग्रंथीत गेली असतां योगी मोक्षपद प्राप्त करुन घेतो.
कुंडली कुटिलाकारा सर्पवत्परिकीर्तिता॥
साशाक्तिश्चालिता येन संयुक्तो नात्र संशयः॥
हठयोग प्रदीपिका पृ. १०७
गोरक्षपद्धतीत मुलाधारातून षट्चक्राचे कसे स्थित्यंतर करीत कुंडलिनी जाते याचे यथार्थ वर्णन आलेले आहे.
श्री गोरक्षनाथ म्हणतात,
येन द्वारेण गन्तव्यं ब्रह्म द्वारमनामयम् ।
मुखेनाच्छाद्य तद्द्वारं प्रसुप्ता परमेश्वरी ।
प्रबुद्धा बुद्धिं योगेन मनसा मरुतासह ।
सूचिव गुणमादाय व्रजत्यूर्ध्वे सषुम्जयाः।
यानंतर मणिचक्रांत काय रहस्य आहे ते सांगताना श्री गोरक्षनाथ म्हणतात,
कन्दोर्ध्र्वे कुण्डलीशक्ति शुभमोक्ष प्रदायिनी ।
बन्धनायच मूढानां ग्रस्तां वेत्ति सवेद्वित् ।
(कंदाच्यावर मणिपूर चक्रांत कर्णिकेत ८ फेरे असून कुंडलाकार कुंडलीनी शक्ति आहे.
हे मूर्ख जनांना वारंवार जन्ममरण रुपबंधन देते आणि योगाभ्यास जाणणार्याला मोक्ष देते!)
कुंडलिनी जागृत झाल्यावर योगी मोक्षपद प्राप्त करून घेतो हे श्री गोरक्षनाथानी स्पष्ट केले आहे व योग अभ्यास न केल्यान हीच कुंडलिनी त्या माणसाला जन्म मरणाच्या फेर्यात अडकवून ठेविते.
हे फल केवळ कुंडलिनी जागृतीने बदलते म्हणून श्री गोरक्षनाथांनी हठयोगांत कुंडलिनी योगाला असामान्य महत्व दिलं आहे.
त्यांनी हेहि स्पष्ट केलं आहे की, साधकाने कुंडलिनी जागृत करण्यासाठी उड्डीयान, मूल व जालंधर ही बंध करावीत.
जर गुरुकृपेने कुंडलिनी जागृत झालीच तर ही तीनहि बंध आपोआप लागतात.
वरील सर्व खुलाशावरून कुंडलिनीचे महत्व मान्य झाले असले तरी कुंडलिनी योग कसा आत्मसात करावा हे गूढ अद्याप उकललेलं नाही असं नाही.
कुंडलिनी जागृतीसाठी नाथपंथात चार साधना सांगितलेल्या आहेत.
१) प्राणायाम
२) जपध्यान
३) गुरुसेवा
४) त्राटक साधनेने
वरील तीन साधनेने कुंडलिनी जागृत होते.
प्राणायामाने सहजगत्या केवळ कुंभक प्राप्त झाला असता कुंडलिनी जागृत होते.
जप धारणेनेहि कुंडलिनी जागृत होते तसेच गुरुसेवा केली असता गुरुच्या प्रसन्नतेने कुंडलिनी जागृत होते.
गुरुसेवेतील कुंडलिनी जागृती ही शक्ति पातातील आहे व नाथपंथी गुरु शक्तिपात सहा तर्हेने करतो.
१) अमृत दृष्टीने
२) शरीर स्पर्षाने
३) अलिंगनाने
४) वाचेने
५) दृष्टांताने
६) सांप्रदायिक पद्धतीने अग्निसाक्ष विधीपूर्वक
त्राटक साधनेनेहि कुंडलिनी जागृत होते पण ही साधना गुरु सन्निध्यांतच करावी असा नाथ पंथीयाचा दंडक आहे.
षट्चक दर्शन
साधकाची साधना चालू असता कुंडलिनी जागृत झाली असता षट्चक्राचे दर्शन मिळते.
त्यावेळी जे अनुभव साधकाला येतात त्या अनुभूतीनेच साधक जास्त साधनशील प्रवृत्तीचा होतो.
कुंडलिनी चक्रांकित होताच खाली चक्रांचे दर्शन होते.
१) मुलाधार (परा)
२) स्वाधिष्ठान ( पश्यंती)
३) मणिपूर
४) अनाहत (बुद्धिपासून वैखरी)
५) विशुध्द
६) आज्ञा
या वरील षटचक्र दर्शन साधकाने नियमित घेतले असता साधक निरोगी होतो व कालांतराने अणिमादि सिद्धी प्राप्त करून घेतो.
तस्मात्सचं ल येन्नित्यं
सुखसुप्तामरुन्धतीम।
तस्याः संचालनेनैव योगी
रोग: प्रमुच्यते ॥ ९॥
येन संचालिता शक्तिः
स योगी सिद्धिमाजनम् ।
किमत्र बहुनोक्तेन
कालं जयति लिलया ॥१०॥
श्री गोरक्षाने वरील विश्लेषण कुंडलिनी जाग्रुतिचे फळ म्हणून सांगितले आहे.
साधकाने ह्या कुंडलिनी योगाचा अभ्यास योग साधनेंत करण्यासाठी प्रथम हठयोगी प्राणायाम साध्य करून घ्यावयास हवा.
त्या शिवाय ह्या अत्यंत शक्तिशाली यौगिक वैभव असलेल्या किमयेचे फल हाती पडणार नाही.
गुरुसेवेतील कुंडलिनी जागृती ही शक्ति पातातील आहे व नाथपंथी गुरु शक्तिपात सहा तर्हेने करतो.
१) अमृत दृष्टीने
२) शरीर स्पर्षाने
३) अलिंगनाने
४) वाचेने
५) दृष्टांताने
६) सांप्रदायिक पद्धतीने अग्निसाक्ष विधीपूर्वक
त्राटक साधनेनेहि कुंडलिनी जागृत होते पण ही साधना गुरु सन्निध्यांतच करावी असा नाथ पंथीयाचा दंडक आहे.
षट्चक दर्शन
साधकाची साधना चालू असता कुंडलिनी जागृत झाली असता षट्चक्राचे दर्शन मिळते.
त्यावेळी जे अनुभव साधकाला येतात त्या अनुभूतीनेच साधक जास्त साधनशील प्रवृत्तीचा होतो.
कुंडलिनी चक्रांकित होताच खाली चक्रांचे दर्शन होते.
१) मुलाधार (परा)
२) स्वाधिष्ठान ( पश्यंती)
३) मणिपूर
४) अनाहत (बुद्धिपासून वैखरी)
५) विशुध्द
६) आज्ञा
या वरील षटचक्र दर्शन साधकाने नियमित घेतले असता साधक निरोगी होतो व कालांतराने अणिमादि सिद्धी प्राप्त करून घेतो.
तस्मात्सचं ल येन्नित्यं
सुखसुप्तामरुन्धतीम।
तस्याः संचालनेनैव योगी
रोग: प्रमुच्यते ॥ ९॥
येन संचालिता शक्तिः
स योगी सिद्धिमाजनम् ।
किमत्र बहुनोक्तेन
कालं जयति लिलया ॥१०॥
श्री गोरक्षाने वरील विश्लेषण कुंडलिनी जाग्रुतिचे फळ म्हणून सांगितले आहे.
साधकाने ह्या कुंडलिनी योगाचा अभ्यास योग साधनेंत करण्यासाठी प्रथम हठयोगी प्राणायाम साध्य करून घ्यावयास हवा.
त्या शिवाय ह्या अत्यंत शक्तिशाली यौगिक वैभव असलेल्या किमयेचे फल हाती पडणार नाही.
कुंडलिनी योगाची साधना करण्यासाठी शक्तिपाताची उदाहरणे आपल्या वाचनांत व ऐकण्यात येतात व त्याप्रमाणे आपल्याला ह्या योगाच्या साधनेची उत्सुकता वाढते.
ही साधना करण्याची प्रेरणा कोणत्याही बाह्य कारणाने झाली असली तरी ती साधना करतांना साधकाने काय करावें याची थोडक्यात चर्चा करतो.
स्थलाभावे हा विषय जास्त वाढविता येत
नाही पण ह्या विषयावर एक स्वतंत्र ग्रंथरचना करण्याची प्रस्तुतच्या लेखकाची इच्छा आहे.
साधकाने गुरु मंत्राचे नियमित जप-ध्यान कर्म करून ही साधन करावी.
साधना
१) शुचिर्भुत होऊन आसनस्थ होऊन समोर एक निरंजन अथवा ज्योतीचा दिवा लावावा व तेथेच सुवासिक उदबत्ती लावावी.
२) गुरुस्मरण करून, गुरुमंत्र जपास सुरुवात करावी व पाठीमागे हाताने माकडहाडापासून वर असा हात काही काळ फिरवावा व नंतर, श्री गणेशाचे स्मरण करून, गुरुस्मरण करावे.
३) तीन वेळा प्राणायाम करून तीन प्रणवाची गायत्री २१ वेळा जपावी.
४) गायत्री जपानंतर गुरुमंत्राचा जप करावा.
५) गुरुमंत्राचा जप झाल्यावर शांत डोळे मिटून बसावे व मूलाधारातून दृष्टी एकाग्र करून वरवर रुद्रग्रंथीकडे आणावी ही क्रिया करीत असता गुरुमंत्र म्हटल्यास ही क्रिया फार प्रभावित होते.
असे नियमित केल्यास सहज ध्यानांतुन कुंडलिनी जागृत होते असा नाथपंथीय संकेत आहे.
लेखक- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ
जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ💐🙏🏻
श्री बाळू मामा गोंदकर यांच्या सौजन्याने
गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती।त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला।सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले।हा दुष्काळ बरेच दिवस होता।शेवटी माता अनसूयेला हे बघवेना व त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या।दत्तगुरु तपस्येत लिन होते।मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले।खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले।एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला।तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला।
ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे।आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे।दर सोमवारी सकाळी 6 वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात।कापूर, रॉकेल,काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते।हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो।त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात।लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो।मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात।
कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते।मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते।महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत।इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत।
आश्रमाच्या वतीने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अखंड अन्नदान चालू असते।चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात।10000 पायऱ्यावर चहा,पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे।प्रचंड वारा, कडक ऊन,धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात।अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू आहे।सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे।पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते।त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो।आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा।'दान' हा शब्दप्रयोग मुद्दाम करीत नाही कारण आपण सर्व तेवढे मोठे अजिबात नाहीत।आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येकाने थोडी चहा पावडर,साखर,दूध असे वर घेऊन जावे,तेवढीच आपलीही सेवा तिथे रुजू करावी।
कमंडलू कुंड,धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे।वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात।
एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा हीच इच्छा।
🙏🏼🙏🏼🙏🏼 जय गिरनारी 🙏🏼🙏🏼🙏🏼
कुंडलिनी योग-
आध्यात्मिक वाङ्मयाच्या वाचकास व साधकास कुंडलिनी हा शब्द अगदी परिचित असाच आहे.
कुंडलिनी शक्तिची जागृती ही साधने फार महत्वाची आहेत
म्हणून आपली कुंडलिनी जागृत व्हावी म्हणून सर्व साधक घडपड करीत असतात.
कित्येक साधकांनी मला प्रश्न विचारले की, कुंडलिनी शक्ति जागृत होते म्हणजे काय होते?
ही शक्ति कोठे असते ?
ही शक्ति खर काय आहे ?
असे अनेक प्रश्न, उपप्रश्न साधक विचारीत असतात.
सारांश, साधकाला ह्या कुंडलिनीच्या प्रभावाची जाणीव असते व त्या प्रमाणे आपल्या जीवनांत असं काही घडाव अस वाटतं.
काही पुस्तकांत महात्म्यांच्या संतांच्या चरित्रांतील कुंडलिनी जागृतीची प्रकरणं वाचून स्वतःच औत्सुक्य वाढवून घेतात.
व ही शक्ति काय आहे हे जाणून घेण्याची धडपड करतात.
नाथपंथातील कुंडलिनी
नाथपंथांत कुंडलिनी हा स्वतंत्र विचार नसून हठयोग म्हणजेच कुंडलिनी योग असा आहे.
कारण हठयोगाचे उद्दिष्ट सामरस्य हे आहे आणि तेच उद्दिष्ट कुंडलिनीच हठयोगांत आहे.
कुंडलिनी योग स्वतंत्र म्हणून योग प्रकरणांचा विचार हठयोगांत नाही.
हठयोगांत शिवशक्ति सामरस्य हे लक्ष असल्यामुळे शक्तिचे स्वरूप निश्चितपणे त्यांना ज्ञात होते हे स्पष्ट आहे.
(दिव्यामृत धारा-पृष्ठ ३९८ प. पू. जोशी
महाराज, आर्वीकर )
कुण्डलिन्यां समुद्भता गायत्री प्राणधारिणी
प्राणविद्या महाविद्या यस्तां वेत्ति स वेदवित् ।।४६॥
-गोरक्षपद्धती
(भावार्थ : कुंडलिनी महाशक्तितून निर्माण होत असते तसेच प्राणवायु धारण करणारी ही अजपा गायत्री आहे !
जीवात्म्याची शक्ति प्राणविद्या स्वरूपहि हेच आहे आणि ह्याच कारणामुळे ह्या कुंडलिनीला महाविद्यापन म्हणतात.
जो योगी ह्या शक्तिला जाणतो तोच अभ्यासाचे तात्पर्य जाणतो.)
वरील श्री गोरक्षांच्या उक्तीवरून हे स्पष्ट होते की हठयोगी हा कुंडलिनीचा अभ्यास जाणतो व त्या अभ्यासाचें खरे मर्म हे प्राणायामांत आहे.
ह्या नाथपंथ योगशक्तीच्या अभ्यासानेंच (जागृतीने ) हठयोग साध्य होतो.
कुण्डलिनीचा आकार
ह्या कुंडलिनीचा आकार कसा आहे, ती कशी आहे व शरिरात ती कोठे वास करून रहाते असे अनेक प्रश्न या कुण्डलिनी योगांत संभवतात.
ही कुंडलिनी शरीराच्या मर्मस्थानांत चक्राच्या आकाराची असंख्य नाड्यांच्या आश्रयाने आंत्रवेष्टनिका नाम नाडी आहे.
कन्दोर्ध्व कुण्डली शक्तिरष्टधा कुण्डलाकृतिः।
ब्रह्मद्वारमुखं नित्यं मुखेनाच्छाद्य तिष्ठति ॥
-गोरक्षपद्धति : ४७
ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायांत ज्ञाननाथ म्हणतात,
"तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी।
अधोमुख सर्पिणी । निजेली असे ॥ २३ ॥
विद्युल्लतेची विडी । वन्हि ज्वाळाच्या घडी।
पंधरेयाची चोखडी। घोटीव जैशी ॥ २४ ॥
तैशी सुबुद्ध आटली । पटी होती दाटली ।
ते वज्रासने चिमुटली | सावध होय ।।२५॥
केशराने न्हालेले नागाचे पिलू वेढे घालून जसे निजावे त्याप्रमाणे नेमकी साडे तीन वेढ्यांची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली असते.
ती नागीण ज्याप्रमाणे मुर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे, त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभी जवळच्या संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते.
ह्या संदर्भात ज्ञाननाथानं कुंडलिनी विजेची वेटोळी असते असे केले आहे.
ही शक्ति देव, असुर, मनुष्य, खग, चक्र, मृग, कीटकादित असते.
कुंडलिनी ही महाशक्तिचेच स्वरूप आहे व त्यांत पृथ्वी व पाणी तत्वांचा अंश आहे.
कुंडलिनीची जागृती
ह्या कुंडलिनी शक्तिची जागृती प्राणायामाने होते असे अनुभवी प्रमाण आहे!
नित्यनियमित प्राणायाम केल्याने कुंडलिनीची जागृती होते.
विशेषतः हठयोगी कुंभकाच्या अभ्यासाने कुंडलिनी लवकर जागृत होते असे अनुभवास आले आहे.
राजयोगपदं चापि लभते नात्रसंशयः
कुंभकात्कुंडली बोधः कुंडली बोध तो भवेत ॥ ५॥
गोरक्ष पद्धति प्र-७६.
(भावार्थ : अशा विधीनें निस्संदेह राजयोगपद प्राप्त होते.
कुंभकाच्या अभ्यासाने आधार शक्ति कुंडलिनीचा बोध होतो.)
श्री गोरक्षनाथांनी आपल्या गोरक्ष पद्धतीत हेच म्हटले आहे की कुंभकाच्या अभ्यासानेच कुंडलिनी शक्ति जागृत होते.
ही शक्ति जागृत होताच तो क्रियावती, वर्णमयी, कलात्मा व वेधमयी होते.
ह्या कुंडलिनींच्या जागृतीनेच षटचक्र दर्शन होते.
कुंडलिनी जागृतीची लक्षणे
कुंडलिनीची जागृती योगाभ्यासाने होते त्यावेळी खालील लक्षणे जागृतीच्या वेळी असतात.
१) साधक जर स्थिर आसनाने बसून जपध्यान करीत असेल तर त्याचे बाह्यज्ञान काही काळाने आपोआप बंद होते व केवळ कुंभक तयार होतो.
२) साधक स्थिर आसनाने ध्यानावस्थेत असता भ्रुमावर जर एकाग्रता करीत असेल तर बुबळ आपोआप हलू लागतात त्यावेळी बाह्मज्ञान बंद होते व कुंभक तयार होतो.
मन शांत होते.
३) साधक स्थिर आसनाने ध्यानावस्थेत असता कुंडलिनी जाग्रुत झाली असता, षट्चक्राच्या ठिकाणी बारीक कंप होऊन तो कंप वरवर जात असल्याच्या संवेदना होतात.
४) ध्यानामध्ये अचानक प्रणवाचा जप चालू होतो व तो स्पष्ट ऐकू येतो.
५) ध्यानावस्था घेतली असता काही वेळा डोळे जड होतात.
बाह्यज्ञान नाहिसे होते, मन शांत होते, शरीरांतून गरम प्रवाह वहात असल्याचा भास होतो व शरीर गरम होते.
६) ध्यानावस्था घेतली असता काही वेळा मेरूदंडात कंप होतो व शरीराचे भान हरपले जाते.
७) काही वेळा प्राणायाम आपोआप चालू होतो व सुगंधी वास येतो.
८) शरीर कधी जड होते.
सुन्न होते.
देहभान रहात नाही.
काही आवाज ऐकू येतात.
९) कांहीं वेळा निरनिराळी चित्रे व प्रसंग तसेच देवतांचे आकार समोर ध्यानात येतात.
१०) कांहीं अचानकपणे नृत्य गायनादि प्रकार करू लागतात.
अशा अवस्थेतहि कुंडलिनी जागृत होते.
वर सांगितलेली कारणे कुण्डलिनी जागृत होत असतांना साधकाजवळ आढळतात.
साधकाने नियमित प्राणायाम केल्यास कुंडलिनी जागृत होते.
गुरुकृपेने कुंडलिनी जागृति
नाथ पंथांत असा एक संकेत आहे की कुंडलिनी ही गुरूच्या कृपेनेच जागृत होते. केवळ गुरुच्या अमृत दृष्टीने कुंडलिनी जागृत होते.
केवळ कुंभकानेच खरी कुंडलिनी जागृत होते असा नाथपंथाचा सिद्धांत आहे आणि केवळ कुंभक गुरुकृपेने होतो हा नाथ संकेतच आहे.
गुरोर्यस्य प्रभावेण सिद्ध केवल कुम्भके ।।
यदि किं करणैर्मुद्रा बन्धनैरेव मादिभिः ।।५२
-शिवयोग सार:
नाथपंथी गुरुच्या कृपेने सहजगत्या कुंडलिनी जागृत होते.
म्हणून शक्तिपाताने कुंडलिनी जागृत करावी लागली नाही.
पण काही प्रसंगी शक्तिपातानेहि शिष्याची कुंडलिनी जागृत करीत.
श्री गोरक्षनाथाने माणिक शेतकर्याची व चौरंगीनाथाची कुंडलिनी अशाच शक्तिपाताने जागृत केल्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
कुंडलिनी जागृती
कुंडलिनी जागृत झाली असता ती शक्तिमान होते व कार्यशील होऊन यौगिक साधनेत असाधारण अवस्था प्राप्त होते.
कुण्डलिनी जागृत झाली असता अजपा सुरू होतो तोच सूक्ष्म वेद आहे व ह्या सूक्ष्म वेदाचा लाभ घेणं म्हणजेच अध्यात्मातील खरी अनुभूती आहे!
कुटिलांगी कुंडलिनी भुजंगी शक्तिरीश्वरी।
कुंडल्या रुंधती चैते शब्दाः पर्याय वाचकाः
-हठयोग प्रदीपिका: पृ. १०७
अशा जागृत कुंडलिनी शक्तिला कोणी कुंडलिनी, भुजंगी, शक्ति, ईश्वरी, कुंडली, अरूंधती अशा सात शब्दानं संबोधतात.
ह्या जागृत झालेल्या कुंडलिनीने ब्रह्म लोकाची प्राप्ती होते.
व मोक्षपद मिळते.
उद्घाटयेत्कपाटं तु तथा कुंचि कया हठात् ।
कुंडलिन्या तथा योगी मोक्षद्वारं विभेदयेत् ॥
अशा ह्या कुंडलिनी शक्तिच्या हातीच योगाचे तंत्र आहे असे हठयोग प्रदिपिकेंत म्हटले आहे.
हिच्या जागृतीनेच योगी असाधारण होतो.
कंदोर्ध्व कुंडली शक्तिः सुप्ता मोक्षाय योगिनाम्
बंधनायच मढानां यस्तां वेत्तिस योगवित्
कुंडलिनी शक्ति जागृत होऊन मुलाधारांतून सरळ रुद्रग्रंथीत गेली असतां योगी मोक्षपद प्राप्त करुन घेतो.
कुंडली कुटिलाकारा सर्पवत्परिकीर्तिता॥
साशाक्तिश्चालिता येन संयुक्तो नात्र संशयः॥
हठयोग प्रदीपिका पृ. १०७
गोरक्षपद्धतीत मुलाधारातून षट्चक्राचे कसे स्थित्यंतर करीत कुंडलिनी जाते याचे यथार्थ वर्णन आलेले आहे.
श्री गोरक्षनाथ म्हणतात,
येन द्वारेण गन्तव्यं ब्रह्म द्वारमनामयम् ।
मुखेनाच्छाद्य तद्द्वारं प्रसुप्ता परमेश्वरी ।
प्रबुद्धा बुद्धिं योगेन मनसा मरुतासह ।
सूचिव गुणमादाय व्रजत्यूर्ध्वे सषुम्जयाः।
यानंतर मणिचक्रांत काय रहस्य आहे ते सांगताना श्री गोरक्षनाथ म्हणतात,
कन्दोर्ध्र्वे कुण्डलीशक्ति शुभमोक्ष प्रदायिनी ।
बन्धनायच मूढानां ग्रस्तां वेत्ति सवेद्वित् ।
(कंदाच्यावर मणिपूर चक्रांत कर्णिकेत ८ फेरे असून कुंडलाकार कुंडलीनी शक्ति आहे.
हे मूर्ख जनांना वारंवार जन्ममरण रुपबंधन देते आणि योगाभ्यास जाणणार्याला मोक्ष देते!)
कुंडलिनी जागृत झाल्यावर योगी मोक्षपद प्राप्त करून घेतो हे श्री गोरक्षनाथानी स्पष्ट केले आहे व योग अभ्यास न केल्यान हीच कुंडलिनी त्या माणसाला जन्म मरणाच्या फेर्यात अडकवून ठेविते.
हे फल केवळ कुंडलिनी जागृतीने बदलते म्हणून श्री गोरक्षनाथांनी हठयोगांत कुंडलिनी योगाला असामान्य महत्व दिलं आहे.
त्यांनी हेहि स्पष्ट केलं आहे की, साधकाने कुंडलिनी जागृत करण्यासाठी उड्डीयान, मूल व जालंधर ही बंध करावीत.
जर गुरुकृपेने कुंडलिनी जागृत झालीच तर ही तीनहि बंध आपोआप लागतात.
वरील सर्व खुलाशावरून कुंडलिनीचे महत्व मान्य झाले असले तरी कुंडलिनी योग कसा आत्मसात करावा हे गूढ अद्याप उकललेलं नाही असं नाही.
कुंडलिनी जागृतीसाठी नाथपंथात चार साधना सांगितलेल्या आहेत.
१) प्राणायाम
२) जपध्यान
३) गुरुसेवा
४) त्राटक साधनेने
वरील तीन साधनेने कुंडलिनी जागृत होते.
प्राणायामाने सहजगत्या केवळ कुंभक प्राप्त झाला असता कुंडलिनी जागृत होते.
जप धारणेनेहि कुंडलिनी जागृत होते तसेच गुरुसेवा केली असता गुरुच्या प्रसन्नतेने कुंडलिनी जागृत होते.
गुरुसेवेतील कुंडलिनी जागृती ही शक्ति पातातील आहे व नाथपंथी गुरु शक्तिपात सहा तर्हेने करतो.
१) अमृत दृष्टीने
२) शरीर स्पर्षाने
३) अलिंगनाने
४) वाचेने
५) दृष्टांताने
६) सांप्रदायिक पद्धतीने अग्निसाक्ष विधीपूर्वक
त्राटक साधनेनेहि कुंडलिनी जागृत होते पण ही साधना गुरु सन्निध्यांतच करावी असा नाथ पंथीयाचा दंडक आहे.
षट्चक दर्शन
साधकाची साधना चालू असता कुंडलिनी जागृत झाली असता षट्चक्राचे दर्शन मिळते.
त्यावेळी जे अनुभव साधकाला येतात त्या अनुभूतीनेच साधक जास्त साधनशील प्रवृत्तीचा होतो.
कुंडलिनी चक्रांकित होताच खाली चक्रांचे दर्शन होते.
१) मुलाधार (परा)
२) स्वाधिष्ठान ( पश्यंती)
३) मणिपूर
४) अनाहत (बुद्धिपासून वैखरी)
५) विशुध्द
६) आज्ञा
या वरील षटचक्र दर्शन साधकाने नियमित घेतले असता साधक निरोगी होतो व कालांतराने अणिमादि सिद्धी प्राप्त करून घेतो.
तस्मात्सचं ल येन्नित्यं
सुखसुप्तामरुन्धतीम।
तस्याः संचालनेनैव योगी
रोग: प्रमुच्यते ॥ ९॥
येन संचालिता शक्तिः
स योगी सिद्धिमाजनम् ।
किमत्र बहुनोक्तेन
कालं जयति लिलया ॥१०॥
श्री गोरक्षाने वरील विश्लेषण कुंडलिनी जाग्रुतिचे फळ म्हणून सांगितले आहे.
साधकाने ह्या कुंडलिनी योगाचा अभ्यास योग साधनेंत करण्यासाठी प्रथम हठयोगी प्राणायाम साध्य करून घ्यावयास हवा.
त्या शिवाय ह्या अत्यंत शक्तिशाली यौगिक वैभव असलेल्या किमयेचे फल हाती पडणार नाही.
गुरुसेवेतील कुंडलिनी जागृती ही शक्ति पातातील आहे व नाथपंथी गुरु शक्तिपात सहा तर्हेने करतो.
१) अमृत दृष्टीने
२) शरीर स्पर्षाने
३) अलिंगनाने
४) वाचेने
५) दृष्टांताने
६) सांप्रदायिक पद्धतीने अग्निसाक्ष विधीपूर्वक
त्राटक साधनेनेहि कुंडलिनी जागृत होते पण ही साधना गुरु सन्निध्यांतच करावी असा नाथ पंथीयाचा दंडक आहे.
षट्चक दर्शन
साधकाची साधना चालू असता कुंडलिनी जागृत झाली असता षट्चक्राचे दर्शन मिळते.
त्यावेळी जे अनुभव साधकाला येतात त्या अनुभूतीनेच साधक जास्त साधनशील प्रवृत्तीचा होतो.
कुंडलिनी चक्रांकित होताच खाली चक्रांचे दर्शन होते.
१) मुलाधार (परा)
२) स्वाधिष्ठान ( पश्यंती)
३) मणिपूर
४) अनाहत (बुद्धिपासून वैखरी)
५) विशुध्द
६) आज्ञा
या वरील षटचक्र दर्शन साधकाने नियमित घेतले असता साधक निरोगी होतो व कालांतराने अणिमादि सिद्धी प्राप्त करून घेतो.
तस्मात्सचं ल येन्नित्यं
सुखसुप्तामरुन्धतीम।
तस्याः संचालनेनैव योगी
रोग: प्रमुच्यते ॥ ९॥
येन संचालिता शक्तिः
स योगी सिद्धिमाजनम् ।
किमत्र बहुनोक्तेन
कालं जयति लिलया ॥१०॥
श्री गोरक्षाने वरील विश्लेषण कुंडलिनी जाग्रुतिचे फळ म्हणून सांगितले आहे.
साधकाने ह्या कुंडलिनी योगाचा अभ्यास योग साधनेंत करण्यासाठी प्रथम हठयोगी प्राणायाम साध्य करून घ्यावयास हवा.
त्या शिवाय ह्या अत्यंत शक्तिशाली यौगिक वैभव असलेल्या किमयेचे फल हाती पडणार नाही.
कुंडलिनी योगाची साधना करण्यासाठी शक्तिपाताची उदाहरणे आपल्या वाचनांत व ऐकण्यात येतात व त्याप्रमाणे आपल्याला ह्या योगाच्या साधनेची उत्सुकता वाढते.
ही साधना करण्याची प्रेरणा कोणत्याही बाह्य कारणाने झाली असली तरी ती साधना करतांना साधकाने काय करावें याची थोडक्यात चर्चा करतो.
स्थलाभावे हा विषय जास्त वाढविता येत
नाही पण ह्या विषयावर एक स्वतंत्र ग्रंथरचना करण्याची प्रस्तुतच्या लेखकाची इच्छा आहे.
साधकाने गुरु मंत्राचे नियमित जप-ध्यान कर्म करून ही साधन करावी.
साधना
१) शुचिर्भुत होऊन आसनस्थ होऊन समोर एक निरंजन अथवा ज्योतीचा दिवा लावावा व तेथेच सुवासिक उदबत्ती लावावी.
२) गुरुस्मरण करून, गुरुमंत्र जपास सुरुवात करावी व पाठीमागे हाताने माकडहाडापासून वर असा हात काही काळ फिरवावा व नंतर, श्री गणेशाचे स्मरण करून, गुरुस्मरण करावे.
३) तीन वेळा प्राणायाम करून तीन प्रणवाची गायत्री २१ वेळा जपावी.
४) गायत्री जपानंतर गुरुमंत्राचा जप करावा.
५) गुरुमंत्राचा जप झाल्यावर शांत डोळे मिटून बसावे व मूलाधारातून दृष्टी एकाग्र करून वरवर रुद्रग्रंथीकडे आणावी ही क्रिया करीत असता गुरुमंत्र म्हटल्यास ही क्रिया फार प्रभावित होते.
असे नियमित केल्यास सहज ध्यानांतुन कुंडलिनी जागृत होते असा नाथपंथीय संकेत आहे.
लेखक- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ
जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ💐🙏🏻
श्री बाळू मामा गोंदकर यांच्या सौजन्याने
गिरनार-कमंडलू कुंड
गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती।त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला।सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले।हा दुष्काळ बरेच दिवस होता।शेवटी माता अनसूयेला हे बघवेना व त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या।दत्तगुरु तपस्येत लिन होते।मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले।खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले।एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला।तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला।
ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे।आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे।दर सोमवारी सकाळी 6 वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात।कापूर, रॉकेल,काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते।हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो।त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात।लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो।मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात।
कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते।मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते।महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत।इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत।
आश्रमाच्या वतीने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अखंड अन्नदान चालू असते।चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात।10000 पायऱ्यावर चहा,पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे।प्रचंड वारा, कडक ऊन,धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात।अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू आहे।सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे।पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते।त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो।आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा।'दान' हा शब्दप्रयोग मुद्दाम करीत नाही कारण आपण सर्व तेवढे मोठे अजिबात नाहीत।आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येकाने थोडी चहा पावडर,साखर,दूध असे वर घेऊन जावे,तेवढीच आपलीही सेवा तिथे रुजू करावी।
कमंडलू कुंड,धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे।वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात।
एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा हीच इच्छा।
🙏🏼🙏🏼🙏🏼 जय गिरनारी 🙏🏼🙏🏼🙏🏼
औक्षण
🔔🔥औक्षण दारात न करता, वास्तूच्या आतमध्ये का करावे ?🔥🔔१. ‘औक्षण’ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय ?
२. औक्षण करण्याचे महत्त्व काय ?
अ. संरक्षक-कवच निर्माण होणे
आ. देवतेचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होणे
३. औक्षण कोणाचे करावे ?
४. औक्षण कोठे करावे ?
५. औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे ?
६. औक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य
औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात शुभप्रसंगी सांगितलेला छोटासा; पण महत्त्वाचा विधी आहे. वाढदिवस, रक्षाबंधन, भाऊबीज,, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याचा हा विधी आहे. त्या विधीविषयी जाणून घेऊया !
औक्षण करतांना
🔔 औक्षण’ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय ?
🔔 औक्षण’ म्हणजे दिव्याच्या ज्योतीच्या साहाय्याने कार्यरत झालेल्या ब्रह्मांडातील देवतांच्या लहरी पृथ्वीवर येण्याच्या क्षणाचे स्वागत करणे आणि तो क्षण टिपून त्याच वेळी त्या लहरींना शरण जाणे.
🔔औक्षण करण्याचे महत्त्व काय ?
🔔अ. संरक्षक-कवच निर्माण होणे
औक्षण करतांना तबकातील दिव्याच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्या किंवा ग्रहण केल्या जाणार्या लहरींचे, औक्षण करवून घेणार्या जिवाच्या देहाभोवती गतीमान संरक्षक-कवच निर्माण होते.
🔔आ. देवतेचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होणे
औक्षण करतांना देवतांना शरण जाऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केल्यानेच अपेक्षित फलनिष्पत्ती होण्यास साहाय्य होते आणि खर्या अर्थाने औक्षणकर्माचे उदि्दष्ट साध्य होते, म्हणजेच औक्षणाच्या माध्यमातून देवतेचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होते.’ –
🔔औक्षण कोणाचे करावे ?
लहान मूल, संस्कार्य व्यक्ती, स्वागतमूर्ती, युद्धावर निघालेला सैनिक, राजा आणि संत यांचे औक्षण करावे.
🔔औक्षण कोठे करावे ?
सर्वसाधारणतः ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला घरात देवापुढे बसवून त्याचे औक्षण करावे. विशेष कार्य (उदा. मुंज, लग्न इत्यादी) असल्यास त्या कार्यस्थळी औक्षण करावे.
🔔घरात देवापुढे औक्षण करणे
औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे ?
‘दाराचा उंबरा हे पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक लहरी ग्रहण करण्याचे आणि त्या पुन्हा पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम आहे. दाराच्या चौकटीमध्ये या त्रासदायक लहरी घनीभूत झालेल्या असतात. दारात उभे राहिल्याने या रज-तमात्मक लहरींनी भारित क्षेत्राचा जिवाला त्रास होतो. जिवाभोवती या त्रासदायक लहरींचा कोश निर्माण होतो. याचा जिवाच्या मनोमयकोशावर परिणाम होऊन तेथील रज-तम कणांचे प्राबल्य वाढल्याने जीव चिडचिडा बनतो. या कारणास्तव दारात औक्षण करणे, हे हिंदु धर्माला संमत नाही. दारात औक्षण करण्यापेक्षा दाराच्या आतल्या भागात, म्हणजेच वास्तूत, शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे. देवघरासमोर रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडून मगच औक्षण करावे. असे केल्याने देवतेचे वातावरणातील चैतन्य जिवाच्या भावामुळे कार्यरत होऊन त्याचा जिवाला अपेक्षित लाभ मिळण्यास आणि त्याला पुढील कार्यास अपेक्षित असे देवतेचे आशीर्वादरूपी बळ मिळण्यास साहाय्य होते.’
(व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी तिची मीठ-मोहरी आणि लाल मिरच्या यांनी दृष्ट काढतात, तसेच तिच्यावरून नारळ ओवाळतात. दृष्ट दारात काढतात आणि ओवाळलेला नारळ उंबरठ्याबाहेर फोडतात. उंबरठा हे त्रासदायक लहरी पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम असल्याने असे करतात. – संकलक)
🔔औक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य
हळद-कुंकू, अक्षता, कापसाच्या वाती, तेल, निरांजन, सोन्याची अंगठी, पूजेची सुपारी इत्यादी.
🔔साहित्याची तबकातील रचना
१. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणार्या शिवाचे (पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे.
२. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी, म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे.
३. अक्षतांच्या थोडेसे पुढे; परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावे. दीप हा जिवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणार्या सुषुम्नानाडीचे प्रतीक आहे. हळदकुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची, तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवतांकडून येणार्या आशीर्वादात्मक लहरी अक्षतांकडून जिवाकडे संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने, दीपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या सुषुम्नानाडीमुळे जिवाने हाती घेतलेले कार्य देवतेच्या कृपेने सफल होते. अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जिवाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.’
🔔 औक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या तबकात ‘हळद-कुंकू आपल्या डाव्या बाजूला ठेवावे’, असे दिले आहे, तर ‘पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी’ यात ‘हळद-कुंकू आपल्या उजव्या बाजूला ठेवावे’, असे दिले आहे. या दोन्हींचा समन्वय कसा साधायचा ?
🔔 पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी ही पूजेच्या वेळी ते ते तत्त्व आकृष्ट करून पूजास्थळ शुद्ध करण्याच्या उद्देशाने व्यापक भावाच्या स्तरावर दिलेली आहे. यात तबकामध्ये समाविष्ट घटक हे रंग आणि गंध कण यांच्याशी संबंधित असल्याने या सर्वांमध्ये शक्तीवर्धक कार्यकारी रजोगुणी सगुणत्व त्यातल्या त्यात हळद-कुंकू यांच्याकडे संक्रमित झाल्याने त्यांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे, तर कनिष्ठ स्तरावरील औक्षणाच्या तबकात सुपारी आणि अंगठी या घटकांचा समावेश झाल्याने ते ते कार्यत्व हळद-कुंकू या घटकांपेक्षा कनिष्ठ स्तरावर कार्य करणार्या रजोगुणाकडे संक्रमित झाल्याने हळद-कुंकू जिवाच्या डाव्या बाजूला सरकवून अंगठी अन् सुपारी या प्राबल्याने कार्यरत असणार्या रजोगुणी घटकांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे. त्या त्या विधीतील कार्यरत रजोगुणी उद्देशाप्रमाणे तो तो घटक जिवाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दर्शवला आहे
साभार.....🙏
श्री क्षेत्र... गिरनार
पुष्प - १
ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे रूप व अत्री ऋषी आणि अनसूया माता यांचे पुत्र असलेल्या दत्तात्रेयांचा संप्रदाय महाराष्ट्र व देशभर पसरलेला आहे. सर्वाधिक दत्त संप्रदाय हा महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रात दत्तात्रेयांची भरपूर स्थाने आहेत. अक्कलकोट, गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी, कारंजा, धनकवडीतील शंकर महाराज मठ व आणखीही बरीच स्थाने आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेरही दत्तसंप्रदायाची श्रद्धास्थाने आहेत. त्याच्यामध्ये कुरवपूर, पिठापूर, गरुडेश्वर, बाळेकुंद्री आणि गिरनार या स्थानांची नावे नमूद करता येतील. वरती नमूद केलेल्या या स्थानांचे स्वतःचे असे एक स्वतंत्र महत्त्व आहे. तेथील परिसर, भारून टाकणारे वातावरण, हे कल्पनातीत आहे उदाहरणादाखल कृष्णाकाठचे नृसिंहवाडी, बेळगावीचा पंत बाळेकुंद्रींचा भव्य आश्रम, नर्मदामैया काठी असलेले वासुदेवानंद सरस्वतींचे गरुडेश्वर येथील समाधी स्थान, ही त्यातील काही निवडक म्हणून नोंदवता येतील
कलियुगात परमेश्वराचे अर्थात गुरू दत्तात्रयांचे प्रत्यक्ष दर्शन होणार नाही असे त्यांनीच सांगितले आहे. त्यामुळे कलियुगात त्यांचे अवतार असलेले नृसिंह सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती, अक्कलकोट स्वामी, शंकर महाराज, पंत बाळेकुंद्री, माणिक प्रभू या त्यांच्या अवतारांनी त्या त्या ठिकाणी राहून दत्तसंप्रदायास मार्गदर्शन केले व आपला अवतार संपन्न केला.
आपण जर दत्त महाराजांची दिनचर्या पाहिली तर, त्यांची दिनचर्या अशी आहे. त्यांचे वास्तव्य मेरू पर्वतावर आहे.
स्नानासाठी ते वाराणसीला गंगेकाठी जातात तर सकाळच्या स्नान-संध्या आचमनासाठी कुरुक्षेत्री जातात. चंदनाच्या उटी लेपनासाठी प्रयाग येथे, तर कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये दुपारच्या भिक्षेसाठी जातात. दत्त महाराज दुपारचे भोजन पांचाळेश्वर बीड येथे करतात. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील राक्षस भुवनला थांबतात तर योगासाठी गिरनार पर्वत येथे जातात. सायं संध्येसाठी पश्चिम किनार्यावर त्यांचे आगमन होते. तर प्रवचन आणि कीर्तनासाठी बिहारमधील नैमिषारण्यात ते येतात. निद्रेसाठी माहूरगडला रेणुकामातेच्या स्थानी मुक्कामी येतात.
आपल्याला माहिती असलेली योगसूत्रे ही महर्षी पातंजली यांनी सांगितली आहेत.
आपले चित्त एकाग्र करून परमेश्वरामध्ये लीन होण्यासाठी योग क्रिया कशी करावी याचा ऊहापोह आणि मार्गदर्शन त्यात केलेले आहे. अर्थात चंचल मनाला ताब्यात ठेवून, योग क्रिया कशी करावी हे पतंजलि योग सूत्र अधिक स्पष्ट करते. सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी सांगितलेली योगसूत्रे अजूनही तेवढीच महत्त्वाची आहेत.
गिरनार या पर्वतावर दत्त महाराजांनी सुमारे बारा हजार वर्षे तपश्चर्या करून योगसिद्धी प्राप्त केली आणि त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या मोक्षासाठी केला. या कारणामुळे गिरनारला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर गिरनार हे दत्तसंप्रदायाचे कॉर्पोरेट ऑफिस आहे, असे म्हणता येईल.
हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर होणाऱ्या उलथापालथीमधून आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून गिरनार पर्वत तयार झाला. ज्वालामुखीतून तयार झालेला हा गिरनार पर्वत, पूर्वी उडणारा असा पर्वत होता. तो पर्वत एकाजागी स्थिर करावा म्हणून सर्व देवांनी गुरु दत्तात्रयांना प्रार्थना केली. त्यानुसार गुरु दत्तात्रयांनी गिरनार पर्वताला एका जागी स्थिर होण्याचा आदेश दिला. त्या आदेशानुसार आज अस्तित्वात असलेल्या गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यात तलेठी येथे हा पर्वत आपणास दिसून येतो. ज्वालामुखीतून तयार झालेला हा पर्वत असल्यामुळे हा पर्वत अतिशय तप्त आणि गूढ व गंभीर असा आहे.
हिमालयासारखा उत्तुंग नसला तरी सिद्ध योग्यांना, भाविकांना भुरळ पाडणारा व त्यांच्या दृष्टीने कायमचे आकर्षण असलेला असा हा गिरनार पर्वत हिमालयाइतकाच महत्त्व असलेला असा आहे. अनेक योगी योगसाधनेसाठी दीर्घकाळ गिरनार या परिसरात वास्तव्य करून होते आणि अजूनही आहेत, असा भाविकांचा विश्वास आहे. गिरनार पर्वतावरील व परिसरातील सिद्धयोग्यांचे दर्शन होणे हा सुद्धा एक योग म्हणता येईल.
क्रमशः ...
लेखक : उदय नागनाथ
मोबाईल : ९४२२०८१०८०
इ मेल : udaynaganath@gmail.com
श्री क्षेत्र... गिरनार
पुष्प - २
श्री क्षेत्र... गिरनार
पुष्प - २
या सृष्टीमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे अव्याहत चालू असणारे चक्र आहे. यामध्ये ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, हा सृष्टी निर्माण करण्याचे काम करतो. म्हणजे या पृथ्वीवर, या जगात, या विश्वाच्या पोकळीत जे काही आहे ते सर्व ब्रह्मदेवाने निर्माण केलेले आहे. येथून पुढेही तोच सृष्टीचा निर्माण कर्ता आहे. तर भगवान विष्णू हा निर्माण झालेल्या जीवजंतू, प्राणी, मनुष्य यांचं प्रतिपाळ म्हणजे पालन पोषण करतो. महेश म्हणजे भगवान महादेव. हा या सर्व सृष्टीचा लय म्हणजे शेवट करतो. अशा या तीन देवांच्या म्हणजे या तीन शक्तींचा मिलाफ आपल्याला या भूतलावर फक्त भगवान दत्तात्रेयांच्या रूपातच पाहायला मिळू शकतो. गुरु दत्तात्रेय हे एकमेवाद्वितीय असे उदाहरण आहे.
आपण जर गुरुचरित्र वाचले असेल तर गुरुचरित्रात लिहिल्याप्रमाणे प्रेताला उठवणे, हे कार्य म्हणजे निर्माण करण्यासारखे आहे. प्रतिपाळ करणे म्हणजे वांझ म्हशीला दूध येणे. हा तिचा प्रतिपाळ झाला तर शेवट म्हणजे ज्याचा शेवट ठरलेलाच आहे अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्यास असमर्थता दाखवणे, हे लय म्हणजे शेवटास नेण्याचे महादेवाचे कार्य !!!
हे सर्व कार्य आपल्याला गुरुचरित्रात गुरुदत्तात्रेयांचे अवतार पार पडताना दिसतात.
ब्रम्हा-विष्णू-महेश या तीनही शक्ती एकाच ठिकाणी एकवटलेले असे एकमेव अस्तित्व आपल्याला गुरुदत्तात्रेयांच्या रूपाने पाहायला मिळते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
गुरु दत्तात्रयांनी विविध चोवीस गुरु करून त्यांच्याकडून शिकून ज्ञान मिळवले.ब्रह्मा विष्णू महेश यांचे आणि २४ गुरु करून मिळालेले ज्ञान आपल्याला फक्त गुरु दत्तात्रेयांच्याकडून प्राप्त होते.
आळशाला गंगा आणि पाप्याला पंढरपूर दूर ...अशी एक मराठीत म्हण आहे. त्याचाच आधार घेऊन, असे सांगता येईल की आळशी माणसाला आणि पाप्याला गिरनार खूप दूर आहे. भारतातील दक्षिणेहून गिरनारला जाणाऱ्या सर्व भाविकांना खंबायतचे आखात ओलांडायची व्यवस्था नसल्याने, आखाताला पूर्णपणे वळसा घालून गुजरातमध्ये प्रवेश करावा लागतो. गुजरात राज्याच्या दक्षिणेकडील टोकाला नव्वद किलोमीटर समुद्रापासून अलीकडे जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वत आहे.
पुण्याहून सुमारे एक हजार किलोमीटरचा तर मुंबईहून आठशे किलोमीटरचा प्रवास करून आपण गिरनारला पोहोचतो. मात्र रेल्वे आणि बसेस त्याची वारंवारिता ( फ्रिक्वेन्सी ) एकूणच जुनागढला जाण्यासाठी खूप कमी आहे. याचा अर्थ भारतातल्या कुठल्याही ठिकाणाहून गिरनारला जाण्यासाठी रेल्वे आणि बस व्यवस्था खूप कमी आहे. मुंबईहून दररोज जाणारी एक रेल्वे आहे. तर पुण्याहून आठवड्यात एक रेल्वे आहे. एरवी मात्र रेल्वेने राजकोटला उतरून पुढे जुनागढला जावे लागते किंवा बसने सुमारे अठरा तासांचा प्रवास करून आपण जुनागढला पोहोचतो.
रेल्वे किंवा बसने जुनागढ शहरामध्ये प्रवेश करताना डाव्या हाताला आपल्याला एका ओळीत असलेले तीन डोंगर दिसतात. सुरुवातीचा डोंगर हा अंबामाताचा तर दुसरा डोंगर गोरक्षनाथ यांच्या स्थानाचा. सर्वात शेवटी दत्तात्रयांचे पादुका स्थान असलेला डोंगर. या दर्शनाने प्रत्यक्ष दर्शन घेण्याची ओढ आणखीन वाढू लागते. नकळत भाविकांचे हात विनम्र भावनेने जोडले जातात.
जुनागढ रेल्वे किंवा एस टी स्टँड पासून सुमारे ७ किमी दूर असलेल्या तलेठी या गिरनारच्या पायथ्याच्या ठिकाणापाशी आपण पोहोचतो.
रेल्वे किंवा एसटी स्टॅंडवरून तलेठीकडे रवाना होताना आजूबाजूच्या चांगल्या हॉटेल / रेस्टॉरंट मधून भोजन करून भाविकांनी पुढे जावे. याचे कारण तलेठीला चांगल्या हॉटेल्सची / रेस्टॉरंटची सोय नाही.
गुजरातमधील प्रवासी आपल्यासोबत खाण्याचे सर्व पदार्थ घेऊन प्रवास करतात. ते बाहेरच्या कोणत्याही खानपान सेवेवर अवलंबून नसतात. त्यामुळेच गुजरात राज्यात बहुतेक रेल्वे गाड्यांना पेंट्रीकार नसते. स्थानिक प्रवासी सोडून अन्य प्रवाशांना याची कल्पना नसल्यामुळे, मिळेल ते खाऊन गुजराण करावी लागते किंवा खाण्याचे हाल होतात, असा माझा अनुभव आहे. प्रवाशांनी गुजरातकडे प्रस्थान ठेवताना किमान नाश्त्याचे पदार्थ तरी बरोबर ठेवावेत. वाटेत मिळणार्या पदार्थांची चव आणि आरोग्यदृष्ट्या त्याचा दर्जा याबाबत कोणतीही खात्री देता येत नाही.
क्रमशः ... २४ सप्टेंबर २०१८
लेखक : उदय नागनाथ
मोबाईल : ९४२२०८१०८०
इ मेल : udaynaganath@gmail.com
श्री स्वामींच्या काही दिव्य आठवणी
१३८. काळ आला पण वेळ आली नाही
निवेदक: सौ. अन्नपूर्णा वसंतराव चिकोडी, बेळगाव
।। श्रीरामसमर्थ ।।
प्रिय वाचकहो ! भगवान श्री श्रीधरस्वामीजींच्या अनुपम महिमेचा मला जो अनुभव आला त्याचे मी थोडक्यांत वर्णन करीत आहे.
डिसेंबर २५, सन १९७६ मध्ये माझे पती आजारी पडले. त्यांच्या उजव्या पायाला Throbo phlebitis होऊन त्यांना जागचे हलता येईना. वैद्यकीय उपायांची शर्त केली. बेळगावातील जवळ जवळ एकूण एक नामांकित डॉक्टरांना दाखविले. पण रोग कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला. हयांना भेटण्यासाठी पाहुण्यांची, लोकांची नुसती रीघ लागली होती येणारे कोणीही धैर्याचे दोन शब्द बोलायचे तर दूरच राहिले, उलट त्यांना बघितल्यावर, ह्यांना 'कमी व्हायचेच कठीण आहे' असें बोलू लागले.
माझ्या त्यावेळच्या मन:स्थितीचे तर वर्णन करणे शक्य नाही. घरांत पहावे तर माझी तिन्ही मुलें वयाने लहान, सासरे वृद्ध, वय झालेले. अशा स्थितीत परमेश्वराशिवाय कुणीही माझा वाली राहिला नव्हता. माझीहि हातापायातली शक्ती नाहीशी झाली होती. पण माझे मन पूर्वीपासूनच भाविक असल्याने मी रात्रंदिवस परमेश्वराची करुणा भाकित असे.
त्यावेळी आमच्या कॉलनीत श्री श्रीधरस्वामींचें मंदिर होते. मी रोज तिथे जाऊन तीर्थं व अंगारा हयांच्यासाठी आणीत होते. त्यावेळी मंदिरात कु. शशीकला या नावाची एक मुलगी होती व तिची स्वामीजींच्याठायी फार भक्ति होती. ती स्वामीजींच्या फोटोपुढे ध्यानस्य बसली तर प्रत्यक्ष स्वामीजी तिच्याशी बोलत असत. पुढे तिच्या सांगण्यावरून आम्ही तिथे अभिषेक केला व श्रीगुरुचरित्र सप्ताहहि सुरू केला. आश्चर्याची गोष्ट अशी की, सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी प्रसाद घेण्यास माझे पती देवस्थानापर्यंन्त चालत आले. ज्यांना जागचे हालायला येत नव्हते, प्रत्येक नामांकित डॉक्टराने यांना पहातांच मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला देत होते, तेच माझे पती हातांत आधाराला कांहीहि न घेता एक फर्लांग चालत आले हे काय थोडे झाले? ही स्वामीजींची कृपाच होय.
सप्ताहांच्या शेवटच्या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले. स्वप्नांत मी व माझी धाकटी बहीण कु. पुष्पा देवस्थानाला गेलो होतो. तें मंदीर श्री बनशंकरी देवीचे होते व तिथे आरती चालली होती. आम्ही दोघीहि हात जोडून उभे असतांना एक अगदी वयोवृद्ध गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातांत गंधाची ताटली होती. माझ्याजवळ येताच त्यानी त्यातले थोडेसे गंध माझ्या टाळूला लावले आणि सांगितले की, 'मुली, मी सदैव तुझ्या रक्षणाला आहे, तूं तुझे डोके शांत ठेव, तुला जीवनात अजून खूप कठीण प्रसंगांना तोंड द्यायचे आहे. तुझ्या पतीच्या पायाचा रोग एकदम कमी होणे शक्य नाही. हळुहळू पण क्रमाक्रमाने कमी होईल. त्याबद्दल तू काळजी करू नकोस. हे उरलेलें गंध तू घरी घेऊन जा आणि त्यांच्या पायाला लाव व त्यांनी ती ताटली माझ्या हातांत दिली आणि लगेच मला जाग आली. जाग आल्यावेळी मला माझें डोके थंड झाल्यासारखे वाटत होते. नंतर देवस्थानास जातांच कु. शशीकलाने मला "आज स्वप्नांत तुम्हाला स्वामीजींनी दर्शन दिले, होय ना?" म्हणून विचारले. यावरून श्री गुरुमाउलींची कृपा किती अगाध आहे, हे सगळयांच्या लक्षात येईल.
स्वामीजींनी माझ्या पतींचे प्राण वाचविले. मला झालेल्या आनंदाचें शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. हिंदु स्त्रीला आपल्या पतीशिवाय जगांत दुसरें काय प्रिय आहे? सांगा! स्वामीजींना भक्तीशिवाय मी दुसरे काय देणे साध्य आहे? माझ्या बालपणापासून मी दत्तउपासक तर होतेच पण स्वामीजी श्रीदत्ताचे अवतार आहेत असे समजल्यावर माझी त्यांच्या विषयींची श्रद्धा अधिकच वाढली. केवढा कठीण प्रसंग माझ्यावर आला होता! पण स्वामीजींनी मला त्यातून पार पाडले म्हणूनच म्हणतात ना! काळ आला होता स्वामीजींच्या कृपेने वेळ टळली.
भगवान श्री श्रीधरस्वामी महाराजांची कृपा अशीच सर्वांवर असू दे, एवढी प्रार्थना करून हा लेख संपवते..
- श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९१०)
सन १९८८
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती-
नर्मदे हर.
पसारकर काका त्यांचे जोडे शोधू लागले होते ते काही सापडेना. वयस्कर गृहस्थ, अनवाणी चालणं कठीण होतं पण इलाज नव्हता. ते अनवाणीच चालू लागले. मागून मोटर सायकलवर एक माणूस आला आणि विचारलं “काका जी कल तो जूते थे? आज क्या हुआ?” आता इतक्या परिक्रमावासिंमध्ये हे काका त्या माणसाच्या लक्षात होते खरच? की तो माणूस उगाच म्हणत होता? की अजून काही?… हो अजूनच काही होतं हे! काकांनी जोडे अदल बदल झाल्याचं सांगितलं. तो माणूस म्हणाला, “दुकान तो दो गाव दूर है, आपके रास्ते भी नही है, आईये आपको गाडीपर ले चलता हुं!” दोन गाव दूर हा माणूस स्वत:चा वेळ, पेट्रोल खर्ची घालून काकांना घेऊन जायला स्वत: हून तयार झाला… पण इथे अजून एक पंचाईत… गाडीवर बसायचं नाही असा काकांचा नियम… मग आता काय? त्यावरही त्या माणसाने उपाय काढलाच! त्याला जणू मदत करायचीच होती. काका गाडीवर बसत नाही म्हणाले तर हा माणूस म्हणतो, “ काकाजी आप चलते रहिये, मै दुकानदार को लेकर आता हुं” तो गाडीवर गेला, दुकानदाराला घेतलं आणि सोबात ३ ते ४ वेगवेगळ्या साईझ चे आणि प्रकारांचे जोडे घेऊन आला. दुकानदाराला परत सोडला आणि काकांच्या जोड्यांचे ही पैसे घेतले नाहीत, पण काकांनी काही एक रकम बळजबरी त्याला दिली.
इथे काय होतं माहितीये का? हे लोक इतका जीव लावतात नं की पैसे देऊ करणं हे सुद्धा अपमान केल्यासारखं वाटू लागतं. त्यांनी केलेलं हे प्रेम, दिलेला हा आदर आणि केलेली मदत या सगळ्यांनी आपण भूतलावर नाही हेच जाणवू लागतं. अतिशय नि:स्वार्थ प्रेम असतं हे. जीवाभावाचे आणि जन्माचे नाते जुळतात इथे. आणि खरं सांगू का, ती नर्मदा माईच त्या त्या रुपात आपल्या बरोबर येत असते.! सांगा नं हजारो परिक्रमा वासी वर्षातली ८ महिने परिक्रमा करत असतात..एकाही परीक्रमावासियाला कधीही उपाशी राहावं लागत नाही, कधी कुठलाही त्रास होत नाही आणि काहीही अडचण आली तर ती विनासायास दूर होते. हे सामर्थ्य कुणाचं? इतक्या परीक्रमा वासियांची जवाबदारी कोण घेतं? कधी कुणाच्या तर कधी कुणाच्या रुपात येऊन, कधी गतजन्माचे राहिलेलें देणेघेणे म्हणून, तर कधी कृपा म्हणून ती नर्मदा माईच हे सगळं घडवून आणते असते नं?
खरच या मोटार सायकल वाल्याने आदल्या दिवशी काकांना जोडे घालून पाहिलं असेल? काल काका जोडे घालून चालत होते आणि दुस-या दिवशी त्यांच्या पायात जोडे नाही इतकी छोटीशी गोष्ट इतक्या बारकाईने त्या माणसाने लक्षात ठेवली असेल? आणि कशासाठी? तो माणूस खरच तो माणूस असेल का? मला तरी वाटतं की ती माझी मैयाच असली पाहिजे. काकांचे जोडे सेट झाले, तो माणूस आला तसा मदत करून निघून गेला. आमच्या गाठीशी ही मैया भेट मात्र कायम देऊन गेला.
पुढे देखील असे अनेक अनुभव आलेत आणि प्रत्येक अनुभवातून मैयाची आपल्याला साथ आहे हे जाणवू लागलं. एक वेळ तर अशी आली की या मैया भेटीची ओढ लागू लागली. काहीतरी अडचण यावी म्हणजे मैया कुठल्यातरी रुपात येऊन ती दूर करेल असं वाटू लागलं आणि तिनी तशी भेट दिली की मग दुसरं काही नको असायचं त्यावेळी. बघा नं किती कमाल आहे, देवाकडे आपण काय मागतो, देवा संकट दूर कर, प्रवास सुखकर होऊदे मात्र या प्रवासात आम्ही संकट मागत होतो, “ देवा काहीतरी अडचण येऊ दे”! कारण ती दूर होणार हा विश्वास इतका प्रचंड वाढला आहे की ती दूर होण्याबद्दल ची काहीही मागणी आमच्याकडून होत नव्हती…
सियाराम बाबांच्या दर्शनानी मन प्रसन्न झालं च होतं. इथून पुढे १५ की मी वर लेपा नावाचं गाव आहे. इथे आजचा मुक्काम करायचा असं ठरलं. लेप्याला जाताना वाटेत एका दुकानात पाणी प्यायला थांबलो असता त्या बाईनी भरपूर ताक आग्रहाने प्यायला दिलं.पुढे वाटेत एका बाईनी केळी दिली आणि त्यानंतर बिस्किटाचा पुडा मिळाला. १५ किमी च्या अंतरात इतकं खायला मिळालं की भूक लागायाला सुद्धा वेळ मिळत नसे . पोट रिकामे होइच ना.
मी आणि सुरेखा ताई जरा मागेपुढे झालो. चित्रा ताई बरीच मागे होती. नाम जप करत करत चालायाचं होतं, आणि सोबत चाललं की गप्पा होत असत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला उसाची शेती होती. माणसाच्या उंचीच्या दुप्पट तरी उंच असेल. वात साधारण ४ फुट असावी. आजूबाजूचं आणि समोरचं पण काही ही दिसत नव्हतं. झाडात खुसफूस खुसफुस व्हायचं तेव्हा थोडं बिचकायला व्हायचं पण भिती अशी वाटली नाही. जेव्हा मला थोड्सं दचकायाला झालं तेव्हाच माझ्या मागून एक बाई लाकडाची मोळी डोक्यावर लादून माझ्या मागून आली आणि म्हाणाली “पंछी घर बनाते है घास मे, उनको खानेके लिये लोमडी आती है, इन्सान को तकलीफ नाही देती” आणि मग पुढे उसाची शेती संपे पर्यंत ती बाई माझ्या सोबत होती. पुढे एका मारुती मंदिरा जवळ मी थांबले आणि ती निघून गेली. त्या मंदिरापाशी कमालीची शांतता होती. बाम्बू च्या झाडांमुळे थंडही वाटत होतं. मी हनुमान चालीसा म्हंटली, थोडा आराम केला आणि पुढे निघाले. आतापर्यंत मला नेटवर्क नव्हतं मात्र थोडं पुढे गेले आणि मांगीलाल वर्मा यांचा फोन आला “दीदी कहां तक पोहोचे? हनुमान मंदिर दूर से दिख जाये तो बताना, मै लेने आ आउंगा” मी मन्दिराहून पुढे आल्याचं मी सांगितलं तसा तो तातडीनं मला घ्यायला आला. तो गाडीवर आला होता आणि मी पायी. त्यांनी मला गावापर्यंत सोबत केली आणि मग चित्रा ताई आणि सुरेखा ताईला घ्यायला गेला. लेने क्यू आये ? विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा उभा राहिला. ज्या हनुमान मंदिरा पाशी मी १५ मिनिट थांबले होते तिथेच आदल्या दिवशीच एका महिलेवर बिबट्या ने हल्ला केला होता. तो बिबट्या जखमी असावा असा गावक-यांचा अंदाज होता आणि म्हणून च एकट्या दुकट्या ने तिथून जाऊ नये असे गावक-यांचे मत होते आणि हेच सांगायला मांगीलाल मला सतत फोन करत होता. मला दचकायला झालं तेव्हा ती बाई अचानक आली होती मागून… खुसफुस पण ऐकली होती मी.. पण मैयांनी मला भिती वाटू दिली नाही आणि ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता तिथे मी अगदीच निवांतपणे बसून हनुमान चालीसा म्हंटला होता….हे सर्व काय आहे याचा विचार करण्यापेक्षा आलेला अनुभव अनुभवून मैयाला हात जोडणं मला जास्त सोपं आणि सुखकर होतं.मैया आपल्या सोबत आहे याची खात्री पटत जात होती.
मांगीलाल ला माझा फोन नंबर अविनाश कडून मिळाला. अविनाश जे अन्नछत्र चालवतो त्यातलं एक लेप्याला आहे. मांगीलाल या अन्नछत्राची पूर्ण जवाबदारी सांभाळतो आहे. इथे मांगीलाल ने जो पाहुणचार केला त्याला तोड नाही. दालाबाटी बटाटे वडा आणि भात असा हा बेत होता. इथे मध्यप्रदेशात शाही पाहुणचार म्हणजे दाल बाटी हे ठरलेलं आहे. खूप आपुलकीनी मांगीलाल आणि परिवाराने आमची सेवा केली. परिक्रमावासी म्हणूनच नाही तर आपल्या लेकी सारखं त्या माई नी आमचं केलं. माहेरवाशीण कशी बागडते माहेरी, तसं तिथे आमचं होत होतं. आता पुढे जाणं भाग होतं. दुस-या दिवशी मी आणि सुरेखा ताई पुढे निघालो. कालचा बिबट्या चा प्रसंग ऐकून चित्रा ताई फार घाबरली होती. तिनी पुढचा प्रवास गाडीनी करण्याचा निर्णय घेतला शाली वाहन पर्यंत तिला मांगीलाल नी गाडीवर सोडून दिलं. मात्र या पुढच्या प्रवासात जे अनुभव आम्हाला आले ते चित्रा ताई अनुभवू शकली नाही याचं वाईट वाटत राहिलं. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असे अनुभव येत असतात हे महत्वाचं. त्यात आपला काहीही सहभाग नसतो. पुढचे अनुभव लवकर सांगते, भाग ९ मध्ये. नर्मदे हर.
©सुरूची नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559
प.पू नानामहाराज तराणेकर यांचे श्रीगुरुप्रेम : अलौकिक श्रीदत्तप्रभूंची भक्ती
परम पूज्य नाना महाराजा यांच्या घराण्यात दत्तभक्तीची उत्कटधारा तशी पिढ्यानपिढ्यापासून. असे म्हणतात की सद्गुरू भूमीवर अवतरण्यासाठी ८० पिढयांचे दत्त भक्तीचे पुण्य हवे. हे पुण्य परम सद्गुरुंच्या पुनर्जन्माच्या माध्यमातून प्रगत होत असते.
बालवयातच प.पू नानांना दत्तसाधनेची इच्छा व ओढ वाटू लागली. घराजवळच श्रीदत्तप्रभूंचे मंदिर असल्यामुळे श्रीदत्तप्रभूंचं श्रीगुरु म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये ठेवून जप जाप व श्रीदत्तप्रभूंचे स्मरण नित्य अविरत होऊ लागले. एवढ्या बालवयातच श्रीदत्तप्रभुंच्या भेटी साठी काहीही करण्याची प.पू नानांच्या साधना परिश्रम पाहून घरामधील वडीलधारी मंडळी आश्चर्यचकित होत असत व प.पू नानाचे अतीव श्रीदत्तप्रभूंप्रेम सगळ्यांना भारावून टाकत असे.
आता प.पू नानांना गुरुमंत्र घ्यावासा वाटू लागला. पिताश्रीकडे त्याबाबत विचारणा केली असता "मी तुमचा गुरु नाही. तुमचे गुरु वेगळे असून ते योग्य वेळी दर्शन देतील " असे म्हणून पिताश्रींकडून भक्तीभावाने आशीर्वाद संपादन केला. गुरुमंत्रासाठी दत्तभक्तांसाठी परमपावन असे श्रीगुरुचरित्राचे पारायण करूया असे प.पू नानांचे मन ओढ घेऊ लागले. नेहमीप्रमाणे सकाळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करून संध्याकाळी मोजकाच आहार सुरु केला. पारायण संपताक्षणी आता तरी श्रीगुरु गुरुमंत्रासाठी दर्शन देतील असे मनीच वाटत राहिले. परंतु श्रीगुरूंचे दर्शन अजून झाले कसे नाही, म्हणून पुनच; दुसऱ्या दिवसापासून श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्यास प्रारंभ केली. यावेळी पण श्रीगुरूंचे दर्शन झाले नाही. प.पू नानांची भक्ती अलौकिक त्यामुळे हिरमोड न होऊ देता परत तिसरे पारायण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपला आहार फक्त दुग्धपानावर मर्यादित ठेवला. अजून श्रीगुरुभेटीची वेळ येत नव्हती. पुढे त्यांनी पाचवे व सहावे पारायण केवळ एकवेळ दुग्ध पान करून केले. तरी पण गुरुमंत्राची वेळ आली नाही. प.पू नानांनी आता मनाचा हिय्या केला कि काहीही अन्न व पेय भक्षण न करता पारायण करायचे. सलग सात दिवस पोटात अन्नग्रहण नसल्याने थोडेसे क्षीणत्व आले पण श्रीगुरुभक्तीपुढे ते सारे गौण ठरले.
आज श्रीगुरुचरित्राच्या सातव्या परायणाचा शेवटचा दिवस. शेवटचा अध्याय वाचून झाला. प.पू. नाना " आता तरी श्रीगुरु या " अशी आर्त गुरुविनवणी करू लागले. आणि श्रीगुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वायूवेगाने
प.पू नानांच्या उत्कट भक्तीपुढे दर्शनांकित झाले. प.पू नानांची अवस्था त्याक्षणी काय सांगावी.?
प.पू नानांच्या डोळ्यात आनंदाश्रू बरसत होते व त्याही भेटीत प.पू नानां श्रीगुरूंना म्हणाले " क्षमस्व गुरुदेव !! आपणास माझ्यामुळे इथंपर्यंत यायचा त्रास झाला ". त्यावर श्रीगुरूं उदगारिलें "बाळा किती कष्ट घेतोस "
श्रीगुरुंची चरणभेट झाल्यावर प.पू नानांनी दत्तभक्तीचा प्रसार करावा असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला. श्रीगुरुनी पुढे होऊन प.पू नानांच्या कानात गुरुमंत्र अनुग्रहित केला. त्या क्षणाला प.पू नानांना समाधीचा अनुभव लाभला. श्रीगुरु साक्षात श्रीदत्तप्रभूंचं. श्रीगुरूंना पण आनंद झाला असेल , अशी श्रीदत्तप्रभूंची भक्ती निग्रहपूर्वक करणारा भक्त प.पू नानांच्या स्वरूपात शिष्य म्हणून लाभला.
परमपूज्य नाना महाराजाचे स्मरण करताना प.पू नाना महाराजांची भक्ती श्रीगुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या भेटीसाठी किती ओतप्रेत हृदयामध्ये भरलेली होती हे दिसते.
प.पू नानां महाराजानी दत्तभक्तीचा प्रसार करताना धार्मिक स्थळांना भेटी देऊन दिव्य अनुभव घेतले. सिद्धीही प्राप्त झाल्या त्या त्यांनी दीनदुबळ्या भक्तासाठी आचरणात आणल्या. प.पू नानांमहाराजाच्या दिव्य अनुभवाचे अवलोकन करताना रोमांच उभे राहतात. प.पू नानांमहाराजानी हिमालयात सूक्ष्म रूपाने भ्रमण करून महाभारत काळामधील श्रीहरीच्या साक्षीने श्रीगीतेचे अनुग्रहण संपादित करणारे दिव्य योगीमहात्मा , यांच्याकडून श्रीगीतेचे ज्ञान संस्कारित केले. नर्मदापरिक्रमा करताना कष्टमय प्रवासाने व अन्ननिग्रह असल्याने प.पू नानांमहाराजाना थोडेसे थकल्यासारखे वाटले व वृक्षाखाली विश्रांती करत असताना नर्मदामैयाने सुवर्णअलंकारीत स्त्रीचे रूप घेउंन प.पू नानांना दुग्धघटिका अर्पण केली. एके ठिकाणी राम मंदिरात दर्शन केल्यावर तेथील अर्चकाने प.पू नानांना आग्रहाची विनंती केली केली की रात्री येथेच मुक्काम करावा. त्या रात्री प.पू नानांमहाराजानी जे अनुभवले ते अद्भुत होते. राम लक्ष्मण यांच्या मूर्तीतून दोन तेजस्वी दिव्यमूर्ती बाहेर आल्या व दोघे ब्रज भाषेत संवाद करत खेळ खेळू लागले. प.पू नानांमहाराजाना गिरनारी श्रीअवधूत दर्शन , नाथ दर्शन , मथुरेत श्रीकृष्ण दर्शन व अनेक देवतांचे दिव्य दर्शन होउंन श्रीगुरुंची प्रीती अनुभवली.
शेवटी श्रीगुरुभक्तीसाठी मननिग्रह हेच प्रमुख साधन आहे व अध्यात्मिक वाटचालीत श्रीगुरुंची करुणात्रिपदी व श्रीगुरूंचा जप हेच नित्य आचरणात असले पाहिजे , तीच मुख्य साधना पद्धती आहेत हा प.पू नानांमहाराजाचा आग्रह आहे,
!!! आजच्या प.पू नानांमहाराजाच्या पुण्यस्मरण दिनी त्यांना साष्टांग चरणवंदन !!!
स्थूलदेह जरी नसला तरी सूक्ष्म देहामध्ये आज प.पू नानांमहाराज भक्तासाठीं कार्यरत आहेत , दत्तभक्तांना साधनेसाठी आपले मार्गदर्शन देण्यासाठी अधीर आहेत, या कलियुगात श्रीगुरूंमुळेच दत्तभक्तच तारून जाणार आहेत.
शेवटी एवढेच श्रीदत्तमहाराजांची आवडीची ओळ गुणगुणावीशी वाटते.
!!! " भजा भजा हो श्रीगुरूंसी " !!!
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा ll
ll नमो गुरवे वासुदेवाय ll
ll श्रीपादराजम शरणं प्रपध्ये ll
नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती- भाग ९
नागराज दर्शन, केवळ ८ इंचांवरून!
नर्मदे हर
मी आणि सुरेखा ताई मांगीलाल भाई कडून पुढे निघालो. वाट तशी एकट होती, पण मोठी होती. रस्त्याने अगदी अधून मधून एखादी दुचाकी जाताना दिसायची. मी आणि सुरेखा ताई मनातून तशा शांत होतो पण कालचा बिबट्याचा प्रसंग कुठे तरी मनात होताच. भीती मात्र वाटत नव्हती. पुढे वाटेत वेदा नदी लागते आणि इथे मैया चा आणि वेदा नदीचा संगम आहे म्हणून या जागेला वेदा संगम म्हणतात. लेप्याला मैया किना-याहून वाट नसल्याने जाता येणा शक्य नव्हते म्हणून २ किमी पलीकडचा रस्ता घेऊन आम्ही चालायला सुरवात केली. मात्र नदीवर पूल आल्यावर आम्ही गोंधळलो. कारण पुलावर कुठेही नदीचं नाव लिहिलेलं नव्हतं. ही मैया का वेदा हे समजण्याइतकं मैयाचं रूप अजून आम्हाला अंगवळणी पडलं नव्हतं. रस्ता तर निर्मनुष्य. आता करायचं काय? मैया ओलांडायला नको होती. आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. कुणी येता जाता दिसलं की विचारू असं म्हणून बराच वेळ होऊन गेला होता. आता तिचा पुकारा करण्याशिवाय हातात काही नव्हतं.
आम्ही दोघींनी मोठमोठ्याने नर्मदे हर च्या आरोळ्या द्यायला सुरवात केली. साधारण ५ मिनिट आमच्या नर्मदे हर ला काही उत्तर आलं नाही. मात्र मग झाडी मागून नर्मदे हर चा आवाज आला आणि एक माणुस पुढे आला. निळ्या रंगाचा शर्ट, तपकिरी रंगाची पॅंट, आणि तपकिरी रंगाचा ओढणीवजा स्कार्फ त्याने घातलेला होता. दाढी मिशा आणि कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेला हा माणूस आपुलकीनी हसत हसत म्हणाला “जाओ जाओ ये नर्मादाजी नही है” आम्ही त्याला काहीही प्रश्न न विचारताच त्यांनी उत्तर दिलं होतं. “आप यहा क्या कर रहे हो भाई जी” विचारल्या वर दूरवर बोट दाखवत म्हणाला “रेत की खान में काम करता हु” त्याने जिकडे बोट दाखवलं ते अंतर तसं बराच लांब होतं. आमचा आवाज तिथवर जाऊन अवघ्या ५ मिनिटात हा माणूस आला आणि आम्ही न विचारताच आम्हाला जायला सांगितलं यावर आमचा विश्वास तर बसत नव्हता पण किमया असते आणि त्यावर विश्वास आपोआप बसतोच … तसे अनुभवच ती आपल्याला देत असते असा विचार करत आम्ही पुलावर चालू लागलो.
आम्ही जास्तीत जास्त ५०० मिटर चालून झालं असेल तोच पुला पलीकडून एक ट्रॅक्टर येताना दिसला. येणा जाणा-याला नर्मदे हर करायचं म्हणजे तेवढाच आपला जप होत जातो म्हणून आम्ही नर्मदे हर करण्यासाठी थांबलो मात्र दोघी आश्चर्य चकित होऊन बघत राहिलो होतो. कारणही तसच होतं. आत्ता पाच मिनिटापूर्वी ज्या माणसाने आम्हाला जा म्हणून सांगितलं तोच माणूस समोरून ट्रॅक्टर घेऊन येत होता. असं कसं शक्य आहे? पण असं झालं आहे. आम्ही दोघीही एकाच वेळी एकमेकींकडे बघत होतो… हा माणूस आता जेमतेम ५ मिनिटापूर्वी अचानक झाडीतून आला आणि आता हाच समोरून येतो आहे? बरं पुलापलीकडे जायला दुसरा कुठलाही रस्ता नाही, हा माणूस आमच्या मागून गेला नव्हता आणि मुख्य म्हणजे हे ट्रॅक्टर येताना आम्ही बघितलं होतं, ते फार दुरून येत होतं….. आम्हाला दोघींनाही भ्रम झाला अस जरी मान्य केलं तरी आम्ही नर्मदे हर म्हणाल्यावर त्या ट्रॅक्टर वरच्या माणसाने “अभी तो नर्मदे हर किया ना?” अशा प्रकारचे भाव प्रदर्शित केले आणि गालातल्या गालात हसून पुढे गेला. आपण एखाद्याची गंमत करतो आणि समोरच्याचा उडालेला गोंधळ बघून “ क्यू कैसी रही” असं विचारतो नं तसे भाव होते त्याच्या चेह-यावर होते. आता आमची खात्री पटली होती. आम्ही दोघी आता केवळ रडायचे बाकी होतो. आमच्या कंठातून शब्दच फुटत नव्हते. तो दृष्टी आड जाई पर्यंत आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो. आणि मग पुढची वाटचाल सुरु केली. आम्हाला सावरायला तेवढा वेळ हवा होता.
पुढे निघालो आणि माकडखेर्डा गावाकडून पुढे मांडव्य ऋषींच्या अश्रमाचं आणि त्यांनी जिथे अनेक वर्ष तप केलं त्या गुहे चं दर्शन घ्यायचं होतं. सुरेखा ताईच्या पायाला छाले आले असल्याने आम्ही बरच हळू चालत होतो. गाव संपून आम्ही मैया किना-याने चालू लागलो. एकिकडे मैया, आणि दुसरी कडे जंगल असा हा रस्ता होता. वाटेत काही मध्यप्रदेशी परिक्रमावासी अम्हाला पार करून पुढे निघून गेले…”बहोत धीरे चलते हो मैया आप” असं ही म्हणाले…आणी झपाझप निघून गेले..पुढे एक ओढा येणार आहे हे आम्हाला पुढच्या परिक्रमावासिंनी फ़ोन वर सांगितलं होतं.
गळाभर पाणी आहे, ओढा ओलांडून यायचं नसेल तर घनदाट जंगलातून ४ किमी चा फ़ेरा घेऊन यावं लागेल असं ही सांगितलं होतं. आम्ही खरं तर ती चार किमी दूर् ची वाट घेणार होतो, पण तशी वाट आम्हाला कुठेच दिसली नाही. आम्ही ओढयाजवळ पोहचलो त्यावेळी ते मागे भेटलेले मध्यप्रदेशी परिक्रमा वासी तिथेच बसून होते..” म्हणाले, आपके लिये रुके है एक घंटे से…आप सामान के साथ कैसे पार करोगी?, आओ हम आपकी मदद कर देते है”… ही बुद्धी त्यांना कुणी दिली असेल?
हा अनुभव इथेच संपत नाही… त्या परिक्रमावासींनी आमचं सामान घेतलं, आणि गळ्यापर्यंत पाणी असलेल्या त्या ओढ्यातून…ओढा कसला,…नालाच म्हणावा असा घाण होता तो..दलदल होती, तिथून पार करवून नाल्याच्या त्या बाजूला पोचवलं… आता आम्हाला जायचं होतं. आमच्या जवळचा दंड खाली पाण्यात खोचायचा आणि कुठे जरा ट्णक जमीन आहे याचा शोध घेवून मग तिथे पाऊल ठेवायचं..सगळी दलदल, पाऊल ठेवलं की गुडघ्यापर्यंत आत रुतायचं, आणि असं एक एक पाऊल टाकत हा ८ ते १० फ़ुटाचा नाला आम्हाला पार करायचा होता. मी पुढे आणि सुरेखाताई मागे असं आम्ही नाल्यात एक एक पाऊल चालू लागलो. आम्ही नाल्याच्या अगदी मध्य भागी होतो, पाण्याला खूप जोर होता, उभं राहणं ही कठीण होत होतं आणि अशा वेळी मझ्या समोरून एक १० १२ फ़ुटांचा नाग फ़णा काढून आमच्या दिशेने येताना जेव्हा मी बघितला तेव्हा माझ्यातले त्राण गेले…. विचार करायच्या आत तो माझ्या ४ फ़ुटावर येऊन पोहचला होता… आता फ़क्त शेवटचं नर्मदे हर म्हणायचं आणि त्या नागराजापुढे शरण जायचे, इतकेच बाकी होते…सगळं संपलेलं होतं…तो आता माझ्यापासून जेमतेम १ फ़ुटावर होता…मी फ़क्त स्तब्ध उभी होते, सुरेखाताई माझ्या मागे होती…. आधी प्राण मला सोडायचे होते… आणि माझ्यापासून साधारण ८ इंचावर येऊन या नागराजाने त्याची दिशा बदलली…आणि माझ्या बाजूने निघून गेला…त्याचा मला स्पर्श झाला नाही, मात्र पाण्याच्या हालचाली मुळे त्याच्यामधील ताकतीची कल्पना मला आली होती…तो निघून गेल्यावरही, गळ्याभर पाण्यात मी आणि सुरेखा ताई, साधारण ५ मिनिट स्तब्ध उभ्या होतो….
खरं तर हा अनुभव इथे ही संपत नाहीच……या अनुभवामागे नर्मदा मैयाचं एक प्लानिंग होतं मात्र ते आम्हाला आम्ही मांडव्य आश्रमात पोहचल्या नंतर समजलं आणि मन अक्षरश: भरून आलं. ती नर्मदा माई किती कनवाळू आहे आणि आपल्या लेकरांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी ती कसे कसे मार्ग काढते हे जेव्हा जेव्हा जाणवतं आणि आठवतं तेव्हा तेव्हा मी नर्मदामय झालेली असते… असाच तो मांडव्य आश्रमातला नागाच्या अनुभवा नंतर चा खुलासा…पण काय ते पुढच्या भागात सांगते.
©सुरूची नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559
खंड पहिला. दंड दिक्षा श्रीक्षेत्र उज्जयिनी
शके १८१३. भाग ३
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराज यांचे दंडगुरू प.प.श्रीनारायणनंदसरस्वतीस्वामीमहाराच हे दत्तावतार श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामीमहाराज यांच्या वंशातील कारंजा गावचे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ब्राह्मण असून ते समर्थ संप्रदायातील होते. त्यांचे गुरू श्रीअनिरुद्धानंदसरस्वतीस्वामीमहाराज व त्यांचे गुरू श्रीअच्चुतानंदसरस्वतीस्वामीमहाराज अशी ही गुरुपरंपरा आहे. पुढे श्रीनारायणनंदसरस्वतीस्वामीमहाराज आजारी पडले. त्यावेळी देवांच्या आज्ञेप्रमाणे श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामींनी उज्जयिनीला जाऊन श्रीगुरुस्वामींची शिष्यधर्माला अनुसरून सेवा केली. ही हकीकत श्रीस्वामीमहाराजांचा दहावा चातृर्मास संपल्यानंतरची, शके १८२३ मधील आहे. श्रीस्वामी नारायणनंदसरस्वतींनी शेवटी चाफळ मुक्कामी प्रभु रामचंद्रासमोर समाधी घेतली. आपल्या गुरूच्या संप्रदाया प्रमाणे श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराज गुरूच्या स्मरणार्थ दरवर्षी दासनवमीचा उत्सव करीत असत.
क्रमशः
श्रीनारायणनंदसरस्वतींनी श्रीस्वामींच्या कानापर्यंत पोहोचेल एवढ्या उंचीचा पळसाचा दंड घेऊन त्यावर काळ्या गायीच्या केसांच्या दोरीचे चार अंगुले वेष्टन करून तो श्रीस्वामांना दिला व " सखे मा गोपाय " या मंत्राने श्रीस्वामींनी तो ग्रहण केला.
त्यानंतर ते त्यांना असे म्हणाले की, " चतुर्थाश्रमात प्रवेश केलेल्या आपण आता संन्यास धर्मातील पवित्र असा दंड ग्रहण केला आहे. या दंड ग्रहणामुळे आपल्यावर जी बंधने येतात त्यांची आपण यती असल्यामुळे आपणास पूर्ण जाणीव आहे. सर्वसंग परित्याग केलेल्या ब्रह्मज्ञानी अशा आपणास आज परमहंस ही संज्ञा प्राप्त होत आहे " असे म्हणून श्रीस्वामीनारायणानंदांनी वस्त्र वर धरून "पश्चामि देवान् " या मंत्राने श्रीस्वामींना "वासुदेवानंदसरस्वती" असे नाव दिले व ते उच्चस्वराने श्रीस्वामींच्या कानात सांगितले. भगवान् श्रीदत्तात्रेयांनी जेव्हा श्रीस्वामींना स्वप्नामध्ये संन्यास दीक्षा दिली होती त्यावेळी यतिधर्माला अनुसरून " वासुदेवानंदसरस्वती " हेच नाव त्यांच्या कानात सांगितले होते. इत:पर अधिकारी माणसालाच संन्यास द्यावा, योगपट्ट करावा व ज्येष्ठ यतीला नमस्कार करावा असा अधिकार श्रीनारायणनंदसरस्वतींनी आपले नूतन शिष्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराज यांना दिला. गुरूने शिष्याला दंड दिल्यानंतर संप्रदायानुसार त्यांनी श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराजांना नमस्कार केला. नंतर " नारायण " असे म्हणून श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराजांनी आपल्या गुरूला उच्चासनावर बसवून त्यांना नमस्कार केला व मग तेथे उपस्थित असलेल्या इतर यतींना नमस्कार केला.
क्रमशः
॥ श्री सद्गुरू नाथ महाराज की जय ॥
॥🌹🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🌹॥
श्री थोरले स्वामी महाराज चरित्र
खंड पहिला. दंड दिक्षा श्री क्षेत्र उज्जयिनी
शके १८१३. भाग ४
दंड ग्रहण केल्यानंतर श्रीस्वामीमहाराजांनी तेथे असलेल्या सर्व संन्यासी मंडळींना मठभिक्षेचे आमंत्रण देऊन त्यांना मठभिक्षा दिली व आपण स्वत: देवांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे माधुकरीला जाण्यासाठी श्रीगुरुस्वामींकडे अनुज्ञा मागण्यास गेले. आपल्या या विषयाचा अधिकार केवढा मोठा आहे याची श्रीनारायणनंदस्वामींना कल्पना नव्हती. आपल्या शिष्याच्या माधुकरी मागावयाला जाण्यामागे यापूर्वी जो इतिहास घडलेला होता तो त्यांना कसा ठाऊक असणार ? त्यामुळे त्यांनी श्रीस्वामीमहाराजांना माधुकरीला जाण्यासाठी अनुज्ञा न देता "तुम्ही आजच दंड ग्रहण केला आहे, तेव्हा आज आम्हां सर्वांबरोबर मठभिक्षा करणेच उचित होईल" असा आग्रह घरला. त्यावेळी "देवांच्या आज्ञे विरुद्ध आपणाला मठभिक्षा करता येणार नाही" असे सांगून आपण मठभिक्षा न करता माधुकरी मागण्यांचे कारण काय आहे हे श्रीस्वामीमहाराजांनी श्रीगुरुस्वामींला सांगितले; पण त्यांना ते पटले नाही. उलट त्यांनी आग्रह धरला की, "आज तुम्ही आमच्याबरोबर मठभिक्षा केली नाही तर आम्ही कोणीसुद्धा भिक्षा घेणार नाही." श्रीस्वामीमहाराजांना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. गुरुंची आज्ञा मोडवेना आणि श्रीदत्तप्रभुंच्या आज्ञेविरुद्ध जाता येईना. पण शेवटी कोणता तरी एक पर्याय स्वीकारणे भाग होते. त्यामुळे देवांच्या आज्ञेविरुद्ध वागून स्वत: शिक्षा भोगणे त्यांनी पसंत केले.
क्रमशः
॥ श्री सद्गुरू नाथ महाराज की जय ॥
॥🌹🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🌹॥
श्री थोरले स्वामी महाराज चरित्र
अघ्याय पहिला - चातुर्मास पहिला
शके १८१३ श्री क्षेत्र उज्जयिनी
भाद्रपद पौर्णिमेला श्रीस्वामीमहाराजांचा पहिला चातुर्मास संपला. श्रीगुरुस्वामींची अनुज्ञा घेऊन यापुढे श्रीदत्त प्रभूंच्या आज्ञे प्रमाणे सनातन धर्माच्या रक्षणासाठी व प्रसारासाठी त्यांनी आपला आसेतुहिमाचल प्रवास सुरू केला. श्रीस्वामी महाराजांनी संन्यास धर्माला अनुसरून कोणत्याही वस्तूचा संग्रह केला नाही. मात्र नियमांना अनुसरून चार भगव्या लंगोट्या, दोन तशाच छाट्या, दंड, वेळवाचा किंवा लाकडाचा एक कमंडलू, एखादी धाबळी उपनिषदांची पोथी, पंचायतनाचा संपुष्ट, दोन श्रीदत्तमूर्ति व पाणी काढण्याची एक दोरी अशा या एवढ्याच संन्यास धर्माला आवश्यक वस्तू ते जवळ बाळगत असत, ते कधीही कोणाकडून कसलीही सेवा करून घेत नसत. स्वत:ची वस्त्रे धुणे वगैरे कामे ते स्वत:च करीत. त्याचप्रमाणे ते कोणाचा स्पर्शही करून घेत नसत व कोणालाही स्पर्श करीत नसत. शौचाला गेल्यानंतर तसेच दुसऱ्याचा स्पर्श झाल्यास ते स्नान करीत. पुष्कळदा स्नान करण्याचे प्रसंग दिवसांतून अनेक वेळा येत. योग साधनेच्या सामर्थ्यामुळे व श्रीदत्त प्रभूंच्या कृपेने श्रीस्वामी महाराजांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या; पण त्यांचा त्यांनी स्वत:साठी कधी वापर केला नाही. त्यांचा सर्व संचार पायी व अनवाणीच होत असे. या प्रमाणे श्रीस्वामी महाराज अत्यन्त कडकडीत पणे शास्त्रीय नियमांचे पालन करीत असत, त्यामुळे त्यांच्या सदुपदेशाचा जनमनावर तात्काळ परिणाम होऊन लोक स्वधर्माचरणास प्रवृत होत असत. "आधी केले मग सांगितलें" असे श्रीस्वामीमहाराजांचे वागणे होते.
॥ श्री सद्गुरू नाथ महाराज की जय ॥
🙏🥭🥭॥ श्री गुरुदेव दत्त॥🥭🥭🙏
दत्तसंप्रदाय सत्पुरुष
||प. पू. योगिराज श्री गुळवणी महाराज|-3||
प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचा नृसिंहवाडीशी ऋणानुबंध
प. पू. टेंबेस्वामी महाराजानी नृसिंहवाडी मुक्कामी प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुव्दादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले असल्यामुळे गुरुकृपेची आठवण सतत राहण्यासाठी प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. मनोमन ठरवले. त्या नुसार ते प्रत्येक गुरुव्दादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता- भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळून मग प. पू. गुळवणी महाराजाना देखील ओवाळत असत. प. पू. गुळवणी महाराज प्रत्येक सुवासिनीस एक रुपया ओवाळणी घालत. एका गुरुव्दादशीस ओवाळणीसाठी प. पू. गुळवणी महाराजांकडील पाचशे रुपये खर्च झाले. याचाच अर्थ त्या दिवशी सुमारे पाचशे सुवासिनीनी महाराजांना ओवाळले, औक्षण केले !
प. पू. योगिराज गुळवणी महाराज बालपणापासूनच नृसिंहवाडीस येत होते. नृसिंहवाडीतील त्यांचा दिनक्रम - पहाटे उठून कृष्णेचे स्नान करणे, श्री चरणांवर पाणी घालणे, माधुकरी मागणे, अनुष्ठान, महापूजा करणे, श्रीदत्तप्रभूंची यथाशक्ती सेवा करणे, अन्नदान करणे इत्यादि ते अंत:करणपूर्वक समर्पित भावनेने आनंदाने करीत असत.
एकदा तर देवस्थान समितीने वाडी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला श्री स्वामीच्या चरणावर पाणी घालण्यासाठी बंदी केली होती. प. पू. गुळवणी महाराजाना ही बंदी म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटू लागली. त्यांनी आपल्या मनातील ही खंत पुजारीजनांना बोलून दाखविली. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूनी पुजाऱ्यांना विचार प्रवृत्त करायला लावून प. पू. गुळवणी महाराजाना या कठीण नियमातून मुक्त करून आपल्या पादुकांवर पाणी घालण्याची इच्छा पूर्ण करुन घेतली. या बाबतीत पंडित श्री. आत्माराम शास्त्री जेरे पुजारी यांनी पुढाकार घेऊन प. पू. गुळवणी महाराजांची श्री पादुकावर पाणी घालण्याची नित्य सेवा अबाधित ठेवली. या वरुन श्रीदत्तप्रभूंचा प. पू. गुळवणी महाराजांवरील लोभच दृष्टोत्पत्तीस येतो. नरसोबावाडीस असताना प. पू. योगीराज गुळवणी महाराज रोजच्या पहाटेच्या काकड आरतीला न चुकता उपस्थित रहात. देवासमोरच्या खांबा जवळची जागा एक शिंपी न चुकता त्यांच्यासाठी धरुन ठेवत असे. त्या खांबा जवळून प. पू. गुळवणी महाराजाना दरवाजा उघडल्यावर श्री दत्तप्रभूंचे अगदी व्यवस्थित दर्शन घडत असे. त्या शिंप्यास ते प्रतिवर्षी धोतर जोडी प्रसाद म्हणून देत असत.
प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी वंदनीय अशा नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर व परिसरातील अनेक मंदिर वास्तूंचे जीर्णोद्धार केले. जुन्या ओवऱ्या पाडून नवीन प्रशस्त ओवऱ्या बांधल्या. श्रीराममंदिर, नारायणस्वामी, गोपाळस्वामी मंदिर, श्री ब्रम्हानंद स्वामी मठाचे नूतनीकरण केले. श्री उमामातेच्या स्वामी भेटीच्या जागी एक तुळशी वृंदावन उभे केले. प्रशस्त धर्मशाळा बांधली सर्वात उल्लेखनीय व अविस्मरणीय कार्य म्हणजे प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी प्रदक्षिणा मार्गी बांधलेली गोलाकार शिल्प कृती ! सभा मंडप- उत्कृष्ट शिल्पकृतीचा एक नमूना ! मजबूत पायावर सोळा खांबावर आधारलेली कमळाच्या कोरीव कामाने सजलेली ३५० टन वजनाची मजबूत गोलाकार स्लॅब - बांधकाम क्षेत्रातील एक नवलच आहे ! भव्य दिव्य उत्कृष्ट शिल्पकृती ! हा सभा मंडप उत्तम नटलेला असून त्यात गुरुचरीत्रातील उल्लेखनीय प्रसंग चित्रित केले आहेत. प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या संकल्पातून साकारलेला हा गोलाकार प्रदक्षिणा मंडप पाहताना श्री दत्तचरणी लीन झालेले मन प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या देखील सुकोमल चरणांवर भक्तीभावाने मस्तक टेकते ! ज्यांच्या कडून काम करून द्यायचे असते त्याला प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूच अशी प्रेरणा देतात हे वादातीत सत्य नृसिंहवाडीकर नित्य अनुभवत असतातच.
प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या मनी मानसी अहर्निश नृसिंहवाडीच वसली होती. कारण प्रत्येक वेळी वाडीस येताना पाट्याभरुन पिवळी शेवंतीची फुले ते श्रीचरणांवर अर्पण करण्यासाठी घेऊन येत असत. वाडीस असताना कित्येक वेळा पार्सलने देखील त्यांनी पिवळी शेवंती मागवून घेतली होती. नृसिंहवाडीहून कोणी व्यक्ती आली किंवा पुण्याहून कोणी वाडीस जाणारी व्यक्ती भेटली तर त्याच्याबरोबर प. पू. गुळवणी महाराज पिवळ्या शेवंतीची हाराभर फुले न चुकता पाठवत असत. सर्व काही आपल्या लाडक्या आराध्य दैवतासाठी ! स्वारींच्या पोशाखातील जरीची पगडी देखील प. पू. गुळवणी महाराजांनी मापा प्रमाणे बनवून वाडीस श्री स्वारींच्या सेवेस पाठवून दिली होती. देवासाठी उत्तमतेचा ध्यासच जणू प. पू. गुळवणी महाराजानी घेतला होता ! वाडीस दरवर्षी गुरुव्दादशीस जाताना श्री दत्त प्रभूना अर्पण करण्यासाठी उत्तम छाट्या बेळगांव, धारवाडच्या हातमाग वाल्यांकडून ते मागवून घेत. श्री दत्त प्रभूना अर्पण करण्याचे उत्कृष्ट केशर ते थेट काश्मिरहून मागवून घेत असत.
ऑगस्ट १९७३ मध्ये प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी आपल्या जवळील सर्व चांदीची भांडी तसेच त्यांच्या रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी मंडप शिल्पाचे इंजिनियर साहेब श्री. वि. मो. वैद्य यांच्याकडे दिली व सांगितले की ही सर्व भांडी आटवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीने मढवा. हीच सर्व चांदी आटवून प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री. दत्तप्रभूंचे दर्शनी दरवाजे चांदीने मढवलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या इष्टदेवासाठी सर्वस्व वेचले पण कुठे ही वाच्यता नाही ! जाहिरात नाही !
परमेश्वरांचेच परमेश्वराला । हीच पराकोटीची निस्वार्थी भावना
त्या मागे कार्यरत होती असेच म्हणावे लागेल !
जन्मास येणे ही सूर्योदयाप्रमाणे एक नैसर्गिक घटना आहे. तद्वत मृत्यु हे सूर्यास्ता इतके गहिरे सत्य आहे. या दोन्ही घटनांच्या मधला काळ हेच मानवी जीवन व त्याचे कार्य मानावे लागेल. परमपूज्य योगीराज गुळवणी महाराजांचे संपूर्ण जीवन हे गुरुसेवेला वाहिलेले होते. एका मुमुक्षू जीवनाचे शक्तिपात साधनेने व अखंड भक्तीने एका शक्तिपाताचे महामेरु मध्ये रुपांतर झाले होते. प. पू. सद्गुरु टेंबे स्वामी महाराज व प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींच्या या परमशिष्याने अनेकांचे संसार फुलवले अनेकांना शक्तिपात साधनेची प्राप्ती करून दिली. अनेक स्त्री - पुरुषांचे पारमार्थिक जीवन समृद्ध केले. शक्तिपात साधनेचा वारसा जपणारा शिष्य संप्रदाय यांच्याच कृपाशीर्वादाने निर्माण झाला. गुरुभक्तीची अवीट गोडी अनेक भक्तांना यांनी लावली. कित्येकांचे जीवन अक्षरश: सुवर्णकांती प्रमाणे उजळून टाकले. जो प. पू. गुळवणी महाराजांच्या सानिध्यात आला. त्याच्या ऐहिक व पारमार्थिक जीवनाचे विशुद्ध कल्याणच झाले ! प. पू. गुळवणी महाराजानी स्वत:कडे कांही ही शेष न ठेवता दोन्ही हातांनी भरभरून वाटले. परमेश्वरी कृपेचा खजिनाच जणू सर्व भक्तांमध्ये रिता केला !
दत्त म्हणता काय उणे ? उभी त्रिमूर्ती साक्षात ।
काळजाच्या पायावाटे उतरे काळजात ॥
या उक्तीप्रमाणे देण्यासाठी जन्म आपुला ! दत्त म्हणजे दिले ! हेच प.पू. गुळवणी महाराजानी आपल्या जगण्यांतून सिद्ध केले त्यांचे जीवन कार्य हे श्री दत्तप्रभूंच्या कृपाशीर्वादाचेच फलित होते त्यांची दृष्टी, संकल्प, त्यांची स्वप्ने, त्या स्वप्नांची परिपूर्ती, सामान्यालाही असामान्य घडविणारी त्यांची कृपा दृष्टी सारे कांही अलौकिकच ! या सर्वांचे वर्णन करताना वाणी मूक होते, लेखणी मूक होते, अनिमिष नेत्रांनी नुसते पाहणेच उरते ! कारण दृष्य केवळ हृदय पटलावर अंकित करून नेत्र ही मूक होतात. मन हृदय तर या श्रेष्ठ विभूतीच्या सामर्थ्याच्या प्रभावाने अधीच भारून गेलेले असते, त्यामुळे ते ही मुके ! यासर्व मुक्या घटकांनी प. पू. गुळवणी महाराजांची थोरवी ती काय वर्णावी ?
श्री गुळवणी महाराज म्हणतात,
उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान.
भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंता कडे घेऊन जाते.
दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे.
नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे । स्वानंदामृततृप्त।य श्री वामानाय नमो नमः ।।
॥ श्री गुरु शरणम् ॥
दत्तसंप्रदाय सत्पुरुष
||प. पू. योगिराज श्री गुळवणी महाराज-5||
अनन्यभक्ती भक्ताची! प. पु. गुळवणी महाराजांचे शबरीचे कथेद्वारे प्रतिपादन
एकदा दुपारी भोजनानंतर गुळवणी महाराज बसलेले असताना. गुरुचरित्राचा विषय निघाला. तेव्हा एकाने विचारले. श्री गुरूंचे अनेक भक्त गुरुचरित्रात वर्णिलेले आहेत. त्यापैकी गुरूंना प्रिय भक्त कोणाचा? महाराज म्हणाले. "रजक" जो नवव्या अध्यायात वर्णिला आहे. जो पुढील जन्मात बिदर (विदुरानगर) येथील बादशहा झाला. त्या रजकाने एका राजाला सर्व लवाजम्यानिशी जाताना पाहिले. आणि इच्छा प्रदर्शित केली. की असे सुख प्राप्त होईल का? श्री गुरूंनी त्याची इच्छा पूर्ण केली. पुढील जन्मात तो यवन कुळात जन्म घेऊन राजा झाला. आणि सर्व सुखे प्राप्त करता झाला. हे ऐकून महाराजांना विचारले की इतर ज्ञानी यती भक्त असताना, या बादशहात काय विशेष होते? तेव्हा महाराजांनी टेम्बे स्वामी यांच्या ग्रंथातील काही ओळी म्हणून दाखवल्या. त्या यवनाची भक्ती श्रेष्ठ अशी सर्वस्व अर्पणाची अशी होती. त्यामुळे संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी त्याला सदगती दिली. श्री गुरूंच्या अनेक शिष्याना त्यांनी उपदेश केला. ज्ञान दिले. स्वकर्माची जाणीव करून दिली. बिदरच्या बादशाहवर त्यांची विशेष मर्जी होती. त्यांनी यवनाची स्फोटक म्हणजे फोड बरा केला. त्याच्या घरी म्हणजे अंतपुरात जाऊन बायकामुलांना दर्शन दिले, व पापविनाशी तीर्थाशी मुक्ती दिली. यवनाची भक्ती अनन्य अशी होती. तेव्हा महाराजांना कुणीतरी विचारले अजून अशी भक्ती कुणीकुणी केली? तेव्हा महाराज म्हणाले "पुष्कळांनी अशी भक्ती करून परमेशवर प्राप्ती करून घेतली. त्यापैकी एक शबरी होती. शबरी हीन कुळातील होती. प्रभू रामचंद्रानी तिची भक्ती पाहून तिच्यावर कृपा केली. ही शबरी कोण? काय हिची कथा?", महाराज सांगू लागले;
शबरी पूर्वजन्मी एक महाराणी होती. राजमहालतात खुप सुख होते. पण ते शबरीला आवडत नसे. ती महाराणी असल्याने तिला पडदयात च राहावे लगे. त्या बाहेर जाऊ शकत नसे. त्यामुळे खुप दुःखी होत्या. कोणाही संतांची सेवा करू शकत नव्हत्या. कथाश्रवन करू शकत नव्हत्या. एकदा महाराणी शबरी प्रयागच्या कुंभमेळाला गेल्या संतांचे दर्शन होताच त्याना फार आनंद झाला. दर्शन तर झाले पण महाराणी असल्याने इच्छा असून सेवा करू शकत नव्हत्या. त्यामुळे अतिशय दुःखी झाल्या. आत्महत्या करण्याचा निश्चय केला. आत्महत्या हे महापाप आहे. पण प्रयाग त्रिवेणीत कोणी आत्महत्या केली तर पाप लागत नाही. म्हणून संगमात स्नान करता करता संतसेवा करण्याकरता मला पवित्र जन्म मिळेल अशी भावना ठेऊन आत्महत्या केली. ह्याच महाराणी पुढे शबरी झाल्या. एक भिल्ल राज्याचे घरी कन्यारुपाने प्रकट झाल्या. लहानपणापासून त्यांचे हृदय अति कोमल होते.प्रभुवर निरतिशय प्रेम होते.त्या मोठ्या झाल्या व त्यांचे लग्न नक्की झाले.त्यावेळी त्यांच्या वडिलांनी तीनशे बोकड मागवले.शबरीने विचारले"हे का मागवले? वडील म्हणाले "बेटा वऱ्हाडी मंडळींना भोजन द्यायला पाहिजे. "शबरींवर आघात झाला. माझ्या लग्नात या अनेक जीवांची हिंसा होणार! "मला लग्नच करायचे नाही" असा निश्चय करून त्या दिवशी रात्रीच ती घर सोडून पळाली. दक्षिणेस पंपासरोवरजवळ मातंग ऋषींचा आश्रम होता. तेथे पोचली तेथे शांत पवित्र सात्विक वातावरण होते. अनेक ऋषींचे तेथे आश्रम होते. शबरीला ते फार आवडले. तिने विचार केला. की मी ही भिल्लींन आहे. हीन जातीची आहे. कदाचित हे ऋषी माझी सेवा स्वीकार करणार नाहीत. तरी मी अज्ञात राहून त्यांची सेवा करीन. शबरी सबंध दिवस जंगलात फिरे. सुंदर सुंदर फळे फुले एकत्र करी व ऋषी जेव्हा झोपत तेव्हा एकेका ऋषीचया आश्रमात फुलें गुपचुप नेऊन ठेवी. ऋषी रोज पंपा सरोवरात स्नान करण्यास जात. त्यांना काटे बोचू नयेत म्हणून शबरी पहाटे अंधारातच "सीताराम सीताराम" असा जप करीत करीत रस्ता झाडून ठेवी. काटे खडे बाजूला सारी. अश्या रीतीने अज्ञात सेवा करू लागली. कोणासही कळत नव्हते. सर्व ऋषींना आसचर्य वाटे की ही फळे कोण आणतो? शबरी झाडावर झोप घेई दिवसभर अरण्यात फिरून फळे एकत्र करी. मतंग ऋषींना आसचर्य वाटले की कुणीतरी अज्ञात राहून सेवा करतय. त्यांनी निश्चय केला की आज रात्री झोपेचे नाटक करून शोधून काढू कोण ही फळे-फुले ठेवतो ते बघू. दर्भासनावर ऋषी झोपले होते. मध्यरात्रीच्या वेळ होती. त्यावेळी शबरो हळूहळू तिथे गेली व फळे ठेवली. मतंग ऋषी जागेच होते. त्यांनी विचारले "मुली तू कोण आहेस? जात लपवणे पाप आहे. शबरी घाबरली मी तर भिल्लींन आहे. माझ्या हातच्या फळांचा ऋषी आता स्वीकार करणार नाहीत. ते तर तपस्वी ब्राम्हण व मी तर हीन जातीतील शबरी थरथर कापू लागली. ऋषीस वारंवार वंदन करून सांगू लागली. की मी अपराधी आहे. मी तुमची दासी! ऋषींनी विचारले "रोज रात्री तू येतेस? सेवा तू करतेस? तेव्हा शबरी "हो" म्हणाली. मग ऋषींनी विचारले तू दिवसा का येत नाहीस? रात्री येतेस? तेव्हा शबरी म्हणाली "माझी सेवा कदाचित ग्रहण न होईल म्हणून मी रात्री येते". भक्ती हा अलौकिक धर्म आहे. त्याला गुप्त ठेवा. लौकिकात आणू नका. भगवनतास प्रसन्न करण्यासाठी भक्ती करा. सत्कर्माची जाहिरात केल्याने पुण्याचा नाश होतो. मतंग ऋषीस आसचर्य वाटले. की पहा कशी बोलते? ती कोणत्याही जातीची असली तरी हा जीव दैवी आहे. काही साधारण नाही. त्यांनी शबरीस विचारले "मुली तू कोण आहेस?" शबरी म्हणाली महाराज मी एक भिल्लींन आहे. हीन जातीची आहे. माझे नाव शबरी मतंग ऋषींनी विचार केला. जरी ही हीन जातीची असली तरी कर्महीन नाही. हा कोणी महान दैवी जीव भिल्ल योनीत आला आहे. ऋषींनी शबरीस सांगितले, "बाळा जात लपवू नये" कोणतीही जात हलकी नाही. जो स्वधर्म सोडतो. तो हीन तू कुठे राहतेस? शबरी म्हणाली जंगलात फिरते झाडावर राहते. ऋषींचे हृदय द्रवले. व म्हणाले, "पुत्री मी या आश्रमात लहानशी झोपडी बाजूला करवून घेईन तू आजपासून माझी मुलगी". शबरी करीत एक झोपडी करवली व तिला म्हणाले. "तुला सेवा करायची आहे ना? तू या झोपडीत राहा. शबरी शुद्ध होती. तरी कित्येक ऋषींनी विरोध केला. व म्हणाले "या भिल्लीनिस काय ठेवता? मतंग ऋषी म्हणाले, "मी हिला स्पर्श पण केला नाही. मी धर्माची मर्यादा तोडत नाही. तिची जात कोणतीही असली तरी मला वाटते हा जीव फार सुपात्र आहे. फार शुद्ध आहे. येथे एका बाजूला राहिली तर काय हरकत? यावर इतर ऋषी म्हणाले "महाराज हे योग्य नाही. कित्येक ऋषी मतंग ऋषीस म्हणाले. आम्ही तुम्हाला जातीबाह्य करू. मतंग ऋषी म्हणाले तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.
मतंग ऋषी रोज श्रीराम कथा सांगत. शबरी ती ऐके ऋषींना दया आली. त्यांनी कृपा करून शबरीस श्रीराम मंत्राची दीक्षा दिली. श्रीराम मंत्राचा अर्थ समजावीत मतंग ऋषींनी शबरीस सांगितले. की ओम काराचा भावार्थ श्रीराम नामात भरलेला आहे. ओंकारातील "ओम" पृथ्वी तत्वाचे अक्षर "म" हे आकाशतत्वचे अक्षर ते सूर्य आहे. "राम नामात "र" अग्नी तत्वाचे अक्षर "आ" वायुतत्वचे अक्षर सूर्य हे अग्नीतत्व "वाक" (वाचा) व वायू तत्त्व रुपी भावाचया सहयोगाने ओम चे उच्चार न होते.
मतंग ऋषींनी शबरीस सांगितले, मुली सबंध दिवस श्रीराम श्रीराम हा जप कर. हे वेदांचे सार आहे. हा मंत्र अतिदिव्य आहे. श्रेष्ठ आहे. गुरुदेवांनी दिलेल्या श्रीराम मंत्राचा जप शबरी सतत करी. व संतांची सेवा करी.हळूहळू पाप जळू लागले. मन शुद्ध झाले.शुद्ध मनात भगवनताच्या दर्शनाची भावना व तीव्र इच्छा जागृत झाली. एकदा असे झाले ब्राम्ह मुहूर्तावर शबरी झाडून साफसूफ करीत होती, अजून अंधार होता. एक ऋषी स्नान करून येत होते. त्यांचा पाय झाडूस लागला. ऋषींना फार क्रोध आला. त्यांनी शबरीचा तिरस्कार केला व बोलले. "ही भिल्लींन मला शिवली, व त्यांनी शबरीस लाथ मारली. तपसचर्येत भक्तीची साथ नसेल तर तपस्येचे पण पतन होते. भगवनतास ते आवडले नाही. ऋषी जेव्हा पुन्हा स्नान करण्यास गेले. तेव्हा पंपा सरोवराचे जल रुधिरा सारखे लाल झाले. व त्यात किडे पडले. मतंग ऋषींचा सत्संग शबरीस पुष्कळ दिवस घडला. नंतर मतंग ऋषीनि विचार केला. की माझी वेळ आता सम्पत आली आहे. या शरीराचे प्रारब्ध पूर्ण होत आले आहे. मला आता ब्रम्हलोकत जायचे आहे. त्यांनी शिष्यांना सांगितले की मी आता जातो. शबरीस हे कळताच ती धावत आली. तिने गुरुदेवांना वंदन करून म्हणले. की आपण जाणार मग माझे काय होणार? मतंग ऋषी म्हणाले मुली तू येथेच रहा तू तर माझ्यापेक्षाही भाग्यशाली आहेस. मी ज्ञानचक्षुनी राम दर्शन केले. पण तुला तर चर्मचक्षुनी प्रत्यक्ष भगवंतांचे दर्शन होणार आहे. श्रीराम तुझ्या घरी येतील. शबरीला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, "श्रीराम माझ्या घरी येतील ते अनंत कोटी ब्रम्हांडाचे नायक आहेत. जे लक्ष्मी मातेचे स्वामी आहेत. ते माझ्यासारख्या भिल्लीनी कडे? मी तर काही शिकलेली नाही. पैसे नाही., यावर ऋषी म्हणाले, "भगवंत तर प्रेम पाहतो. श्रीराम एक दिवस नक्की येतील. माझा तुला आशीर्वाद आहे.
मतंग ऋषी शबरीला भगवंत येतील अशी आशा देऊन ब्रम्हलोकात गेले. शबरी या आशेवर जिवंत राहू लागल्या.शबरी रामाची प्रतीक्षा करीत त्यांच्या करता सुमधुर फळे आणि.माझे राम आज येतील, उद्या येतील, अश्या आशेने सायंकाळ पर्यन्त रोज प्रभू रामचंद्राची प्रतीक्षा करीत. शबरी नियमितपणे चौफेर साफसफाई करी. मुखाने श्रीराम श्रीराम असा जप करी. स्वछतेचि सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते. या सेवेने भक्तांचे चरणरज मिळते. ते वासनाचा नाश करते.पुष्कळ दिवस शबरीने अशी दिव्य तापसचर्या केली. तप करता करता शबरी आता वृद्ध झाली. शबरी महान योगिनी होत्या. श्रीरामाचे दर्शन झाल्याशिवाय मला मरायचे नाही. मनात निश्चय होता की राम दर्शन केल्यानंतरच मी प्राण सोडिन. शबरी विचार करत होती मी पात्र आहे का? रामराया एखाद्या ऋषीच्या आश्रमात येतील. तेव्हा मी त्यांचे दुरूनच दर्शन घेईन. पुन्हा शबरीला वाटे, नाही! गुरुजींनी मला आशीर्वाद दिला आहे. तेव्हा ते अवश्य येतील.
रघुनाथ फिरत फिरत पंपा सरोवरपाशी आले. मोठ्या मोठ्या ऋषींना हे कळले. व ते धावतच आले.हे ऋषी रामाच्या मागे लागले. व त्यांची मनधरणी करू लागले. की आपण आमच्या आश्रमात यावे. पण श्रीरामांनी सर्वांना विचारले. "शबरी कुठे आहे?" मला शबरीला भेटायचे आहे. मला शबरीच्या घरी जायचे आहे. ज्या दिवशी प्रभू आले त्या दिवशी शबरी घरातच श्रीरामाचा जप करत बसल्या होत्या. शबरीना आशा नव्हती. की श्रीराम त्यांच्या घरी येतील. शबरीला असे वाटले की आजपर्यंत वाट बघितली तरी ते आले नाहीत. पण मी ऐकले आहे. की ते या बाजूला आले आहेत. व त्यांना कोणी ऋषी त्यांच्या आश्रमात घेऊन जातील. श्रीराम माझे घरी येणार नाहीत. पण जे सर्व जीवन भगवंताला शोधतात त्यास एखादा दिवस भगवंतच शोधत शोधत त्याच्या घरी येतत्. बारा वर्षे तापसचर्या करतील. त्यास सिद्धी अवश्य मिळते. भगवंतांनी शबरीच्या चरित्रात बोध दिला आहे. की सर्व जीवनभर जे मला शोधतात त्यांना एखादा दिवस मी शोधण्यास निघतो. व भेटतो. मला सतत शोधा., जे मला सर्व ठिकाणी सतत शोधतो. त्याला शोधण्यास मी येतो. मनुष्याचे जीवन पवित्र असेल तर भगवन्त आमंत्रण शिवाय त्याचे घरी येतील.
आज शबरीच्या आश्रमात राम लक्ष्मण आले आहेत. शबरीला अतिशय आनंद झाला. आणि वाटले जगाचा स्वामी अनंतकोटी ब्रम्हांडाचे स्वामी आज माझे घरी आले. श्रीराम लक्ष्मण यांचे दर्शन करता करता शबरी निशब्द झाल्या. प्रभूने वल्कलवस्त्रे धारण केली होती. डोक्यावर सुंदर जटाचा मुकुट आहे. अंग मेघासारखे श्याम. लक्ष्मण गोरे आहेत. शबरीने दर्भाची दोन आसने दिली. त्या आसनावर राम लक्ष्मण बसले. श्रीराम लक्ष्मणाचे दिव्य प्रेम पाहताच शबरी दर्शनात इतक्या तन्मय झाल्या. की त्यांचे डोळे अश्रूने भरून आले. शबरी श्रीरामासन्मुख बसली होती. व डोळे अश्रूंनी भरल्यामुळे नीट दर्शन करू शकत नव्हत्या. शबरी फार गरीब होती. ती द्रोणात पाणी घेऊन आली. शबरीने चांगली फळे बघून आणून ठेवली होती. रामासाठी आणलेली फळे रामाला अर्पण केली. आणि म्हणाली, "महाराज मी हीन जातीची अधम आहे. मला काही येत नाही. काही ज्ञान नाही. दिवसभर मी फक्त श्रीराम श्रीराम म्हणते. आपण मला आपली म्हणली. आज मी कृतार्थ झाले. माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. पुष्कळ दिवसापासून एकच संकल्प. तुम्ही भोजन करा व मी माझ्या डोळ्याने पाहीन. माझी तुमच्या जवळ काही मागणी नाही. तुम्ही खावे मी दर्शन करावे.
वेदात असे वर्णन आहे. की ईशवरला भूक लागत नाही. तहान लागत नाही. भगवन्त निष्काम आहे. भगवन्त खात नाही. तो तर जगास जेवू घालतो. जगाचे पोषण करतो. भगवन्त विषवमभर आहे. अरे भगवंताला भूक लागली तर जगात काय राहील.
ज्ञानी मानतात की भगवन्त निर्गुण निराकार आहे. तो काही खात नाही.ब्रम्ह खात नाही. बोलत चालत येत जात नाही. जे ज्ञानी असे समजतात त्यांना स्वतःला तर खावेच लागते. भगवन्त म्हणतात, "या ज्ञान्याच्या घरी राहून मला नित्य एकादशी करावी लागेल. ज्ञानी पुरुष स्वतः पोटाची पूजा करतात. परन्तु मला उपाशी ठेवतात. भगवन्त खात नाही हा वेदाचा सिद्धांत आहे. पण ते केव्हातरी जेवतात हे पण सत्य आहे. आनंदमय भगवंतालाही भक्ताचे प्रेम पाहून खाण्याची इच्छा होते. तर भगवन्त खातात ईशवर हा निष्काम आहे. पण शबरी सारखे प्रेम हृदयात प्रकट झाले असेल, तर ते प्रेम निष्काम ईशवरला सकाम करते. आज श्रीरामांना खूप भूक लागली आहे. शबरीची इच्छा होती की श्रीराम खातील व मी डोळ्याने पाहीन. रामप्रभुस खुप भूक लागली होती ते शबरीस म्हणले, "माते मी उपाशी आहे. मला काही खायला दे". भगवनतास तुम्ही जे अर्पण करता ते ते घेतात हे सत्य आहे. जेथे प्रेम असेल तेथे भगवन्त मागून घेऊन खातात. आज शबरीचे प्रेम पाहून भगवनतास भूक लागली. शबरी रघुनाथांस बोरे अर्पण करतात. शबरी ती चाखून देते. कदाचित एखादे आंबट निघू नये म्हणून. अतिशय प्रेमात. शबरीला आज भान राहिले नाही. की आपण उष्टी बोरे रामरायास खाऊ घालत आहोत. श्रीरामांनी उष्ठ्य बोराकडे पाहिले नाही. शबरीच्या शरीराकडे पण नाही. तिच्या हृदयातील भावाकडे पाहिले. शबरीचे शरीर दुर्बल आहे. कपडे मळके आहेत. कपडे मळके असले तरी हृदय शुद्ध आहे. आणि स्वछ आहे. रामानि शबरीच्या बोराची खुप प्रशनसा केली. शबरी कृतार्थ झाली.
श्रीराम मोठ्या मोठ्या ऋषींनच्या आश्रमात पण गेले नाहीत.परन्तु शबरीला कृतार्थ केले.कारण तिचे प्रेम भगवंतास प्रसन्न करण्याचे प्रेम हे एकमात्र साधन आहे. श्रीरामचंद्र यांनी विचारले. तुझी इच्छा काय आहे? शबरीने रामाला विनंती केली या पंपा सरोवराचे पाणी बिघडले आहे ते शुद्ध करा. आपण त्यात स्नान करावे म्हणजे ते शुद्ध होईल. एक ऋषीने शबरीस लाथ मारली म्हणून हे बिघडले. शबरीच्या महिमा वाढवा म्हणून रामाने जमलेल्या लोकांस सांगितले. की माझ्या स्नानाने काही होणार नाही. ते जल सुधारण्याची शक्ती माझी नाही. शबरीचे चरण धुवून ते जल सरोवरात टाकाल तर ते शुद्ध होईल. मग जलात स्नान केले. सरोवराचे पाणी स्वछ व शुद्ध झाले. मधुर झाले. नंतर तिने राम दर्शन करता करता योग अग्नीत स्वतःचे शरीर जाळून घेतले. शबरी कृतार्थ झाली.
श्रद्धा आणि सबुरी यांचे यापेक्षा अधिक उदाहरण असू शकत नाही.
(संदर्भ 'वेध वामनाचा", लेखक:- श्री. नारायण भालेराव)
No comments:
Post a Comment