नमस्कार, 🙏 ब्लॉग वर प्रसिध्द करत असलेली माहिती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तसेच social media व इतर माध्यमातून मिळवलेली आहे ही माहिती जशीच्या तशीच प्रसिध्द केली जाते (मूळ लेखकाचे नाव न बदलता) उद्देश फक्त एकच सर्वाना माहिती मिळावी. यात माझा कुठलाही स्वार्थ नाही आपणांस विनंती की ब्लॉग follow व subscrie करावे🙏
Thursday, July 30, 2020
श्री निपटनिरंजन
Wednesday, July 29, 2020
मानसपूजा
मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.
![]() | ||
|
"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.
येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु श्रीराम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.
पहाटेची वेळ मानसपूजेस चांगली असते. अशा वेळी सुखासन घालून बसावे. चर्मचक्षू बंद करावे. अंतर्मुख होऊन कल्पना करण्यास प्रारंभ करावा.
मानस पूजा
आकाशात क्षितिजावर गुलाबी रंगाची स्वैर उधळण होत आहे,
सुगंध चौफेर दरवळतो आहे,
सतारीचे झंकार उमटत आहेत,
मुरलीचा गोड मंजुळ ध्वनी आसमंतात घुमतो आहे, वेद घोषांचे मंद स्वर एकू येत आहेत.
हृदयातील रक्तवर्ण कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतात. प्रफुल्लित कमळाच्या मध्यभागी सद्गुरुंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडते
त्यानंतर सूक्ष्मरुपातून प्रकट होण्यासाठी सद्गुरुंना मनोमन प्रार्थना करावी. एक तेजाचा झोत हृदयातील पादुकांपासून निघेल, आणि त्यामघून आपल्या समोर सद्गुरुंची सुहास्यवदन सगुण मुर्ती उभी राहील.
सुस्वागतम् सुस्वागतम् असे म्हणून आपण आपल्या सद्गुरुंचे स्वागत करावे.
त्यानंतर चंदनाचा पाट मांडून त्यावर उभे राहण्याची सद्गुरुंना विनंती करावी. ते पाटावर उभे राहील्या नंतर त्याच्या चरणकमलावर सुवर्ण कलशाने पाणी घालावे.
त्यानंतर चांदीच्या वाटीतील दुध घालून पुन्हा पाणी घालावे. अशा प्रकारे पादप्रक्षालन झाल्यावर एका शुभ्र वस्त्राने चरणकमल पुसून त्यावर हळद-कुंकू वहावे.
सद्गुरुंचा भाळी कुंकुमतिलक लावून सुवर्ण तबकातील रुपेरी नीरांजनांच्या ज्योतींनी पंचारती ओवाळावी.
आपल्या घरातील मखमली मंचकावर विश्रांती घेण्यासाठी सद्गुरुंना प्रार्थना करावी.
थोड्या विश्रांती नंतर त्यांच्या अंगातील कफनी काढून ठेवावी. गळ्यातील तुळशीमाळा, कुबडी आणि स्मरणी बाजूस काढून ठेवावी.
कौपीनधारी सद्गुरुंना स्नानगृहात घेऊन जावे. तेथे सुवर्णाच्या चौरंगावर बसवावे.
चांदीच्या वाटीतील सुगंधी तेल सद्गुरुंच्या सर्वांगास हळूवार लावावे.
रूप्याच्या घंगाळ्यातील गंगोदक सुवर्ण कलशांत घेऊन सद्गुंना अभ्यंगस्नान घालावे.
नंतर सर्वांगास उटणे लावून पून्हा गंगोदक घालावे.
स्नानानंतर स्वच्छ आणि शुभ्र वस्त्राने सद्गुरुंचे सर्वांग पुसून घ्यावे.
नवी कौपीन बदलण्यास द्यावी.
नंतर पुन्हा मखमली मंचकावर बसण्यास विनंती करावी.
त्यांना भरजरी कफनी घालावी. गळ्यात तुळशीमाळा घालाव्या हातात कूबडी स्मरणी द्यावी.
त्यानंतर रत्नजडित सिंहासनावर सद्गुरुंना आणून बसवावे. चरणकमल ठेवण्यास सिंहासनापुढे शिसवीचा चौरंग ठेवावा. जैसा शोभे राजा रघुवीर असे भासले पाहिजे.
त्यानंतर पाद्यपूजेची अनुज्ञा घेऊन, पाद्यपूजेस आरंभ करावा.
शिसवीच्या चौरंगावरील सद्गुरुंच्या गुलाबी चरणकमलावर सुवर्ण पात्राने शुध्दोधक घालून पादप्रक्षालन करावे. त्यानंतर पंचामृताने पादुकांना स्नान घालावे. पुन्हा एकदा शुध्दोदकाने स्नान घालावे. नंतर चरणकमलावर अत्तर लेपन करावे.
शेवटी आणखी एकदा उष्णोदकाने पादुकांना स्नान घालून शुभ्र वस्त्राने चरण कमल पुसून घ्यावेत.
त्यानंतर स्वस्तिक चिन्हांकित चंदन गंध लेपन करावे.
सद्गुरुंच्या भाळी उभे गंधलेपन करुन मध्यभागी बुक्याचा टिळा लावावा.
दोन्ही नेत्रांच्या बाजुस गंधाच्या मुद्रिका लावुन घ्याव्या.
सद्गुरुंच्या गळ्यामध्ये जाई- जुईच्या शुभ्र फुलांचा सुंदर पुष्पहार अर्पण करावा.
दोन्ही हातांच्या मनगटावर छोटे गजरे घालावेत.
नंतर पादुकांवर विविध सुवर्णालंकार घालावेत. पादुका तुळशीहाराने सुशोभित करुन शेवंती, चंपक, गुलाब, पुष्पे अर्पण करावीत.
शेवटी अष्टभाव प्रतिक अष्टदल कमळ वहावे. अक्षता, हळद, कुंकू वाहुन घ्यावे.
अहंकाररुपी धूप घालावा.
निराभिमानी बोधवृत्तीच्या तेजाची निरांजने लावून घ्यावी.
सद्गुरुंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवुन रुपेरी पात्रांतुन केशर-वेल दोडे मिश्रीत दुग्ध प्राशन करण्यास द्यावे.
शेवटी तेजाने तेजाची आरती करावी.
पूजेने नटलेल्या शांत सुंदर आणि तेजस्वी सद्गुरुंच्या मुर्तीचे अवलोकन करुन साष्टांग दंडवत घालावे.
सिंहासनारुढ सद्गुरुंसमोर हात जोडून उभे राहून शरणागतीकरीता आत्मकथन करावे.
आत्मकथनात एक दिवसातील आपल्या जीवनातील घडलेल्या बऱ्या -वाईट घटनांचे कथन करावे. चुकल्या - मुकल्या गोष्टीबद्दल क्षमा याचना करावी.
त्यानंतर सद्गुरुंना भोजनासाठी भोजनगृहात घेऊन जावे.
भोजनगृहात पाटरांगोळ्या घातलेल्या आहेत, अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे.
चंदनी पाटावर सद्गुरुंना विराजमान करावे.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या वाट्यांतुन सर्व भोज्य पदार्थ वाढलेले आहेत.
सद्गुरुंना भोजनास प्रारंभ करण्याची विनंती करावी.
खाऊन होताच रुपेरी पात्रातून गार पाणी पिण्यासाठी द्यावे. भोजनोत्तर तांबूल द्यावा.
आता आपल्या सद्गुरुंना स्थूलरुपातून सूक्ष्मरुपात हृदयकमलावर विराजमान होण्यासाठी विनवणी करावी.
सद्गुरुंच्या सगुणरुपामघून एक प्रकाश -शलाका निर्माण होईल आणि आपल्या हृदयांत प्रवेश करील. सद्गुरुंचे सगुणरुप अदृश्य होईल.
पण हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरुंचा सतेज पादुका दिसतील. त्यांचे दर्शन घ्यावे.
हळूहळू कमळाच्या पाकळ्या मिटू लागतील. शेवटी जागेपणीच पाहात असलेल्या मानसपूजेच्या स्वप्नातून आपण भानावर येऊ.
अशी मानसपूजा फारच लवकर संपल्याचे आपल्याला हूरहूर वाटल्यास आपण मानसपूजेत रमलो होतो असे समजावे.
सद्गुरुंना मानसपूजा फार आवडते. प्रत्येक साधकाने रोज नियमाने मानसपूजा करावी.
साधकाच्या दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. एखादे दिवशी जर मानसपूजेला उशिर झाला तर साधकाचे मानसपूजेतील दैवत त्यास जाणीव करुन देते.
सद्गुरुंची मानसपूजा म्हणजे सदेह सद्गुरुंचा सहवास लाभणे होय. सगुणोपासनेचा हा कळस आहे.
क्रममुक्तीच्या पायऱ्या
क्रममुक्ती चार प्रकारे प्राप्त होते
१) सलोकता
२) समिपता
३) सरूपता
४) सायुज्यता
या क्रममुक्तीच्या पायऱ्या आहेत.
१) सलोकता:- आपले आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असते त्या लोकांत राहायला मिळते याला 'सलोकता मुक्ती' असे म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकांत राहतात. तर विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना 'भारतीय' असे म्हटले जाते; परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही. अशी शंभरकोटी माणसे आहेत, की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पाहिलेले नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. परंतु त्यांना भगवान विष्णुंचे दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णुलोकांत राहून विष्णुभक्ती करत रहातात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते व त्यांना समिपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते.
२) समिपता:- समिपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्याजवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याशी बोलण्याचे भाग्य त्याला प्राप्त होते. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रगट होते व त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा येथे संपतो व सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरु होतो.
३) सरूपता:- सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचे ध्यान लागण्यास सुरवात होते. साधक जर विष्णुभक्त असेल तर तो विष्णुरूपाचे ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णुचे रूप दिसू लागते. मीच विष्णू आहे, असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णुचे रूप प्राप्त होते. शनैः शनैः ही शक्ती वाढत जाते व साधक विष्णुच्या रुपात कोणालाही दर्शन देऊ शकतो.
पृथ्वीतलावर असे असंख्य साधक आहेत, की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचे दर्शन झालेले आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे, की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपांत प्रकट होतात व त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचे फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य व अधिकार प्राप्त होत नाहीत.
परदेशामधील अनेक साधक क्रुसावरील येशूख्रिश्ताचे ध्यान करतात व त्यातच ते एकरूप होतात. हळूहळू त्यांच्या देहाला जखमा होतात व त्यातून रक्त वाहू लागते. 'मी क्रुसावरील येशुख्रिस्त आहे.' या भावसमाधीत ते राहतात. देहासहीत प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे असेच म्हणावे लागेल.
४) सायुज्यता:- सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्यदेवतेमध्ये आत्मा विलीन होणे. आत्म्याचा परमात्मा होणे.
मानसपूजा का करावी?
आपण शरीराचे व्यायाम आधी करून शरिर मजबूत करत असतो, परंतु मन आज सर्वत्र बलहीन असताना दिसते. या मनाचा सर्वसाधरणतः कोणी विचार करताना दिसत नाही परंतु, सत्य हे आहे की, जो पर्यंत मन मजबूत होत नाही, तो पर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार, कल्पना, भावना यांना खतपाणी घालण्याची गरज असते. मानसपूजेत आपण देवाला, अर्थात सद्गुरुनां, त्या साऱ्या गोष्टी देतो, जे, वास्तविक आपल्याकडे नाहीत आणि आज रोजी आणता ही येत नाहीत, पण मनात आणता येेतात, आणि एकदा मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येतात. दुसरी गोष्ट, ज्या अत्यन्त मौल्यवान वस्तू आहेत, अश्या वस्तू देवाला अर्थात सद्गुरुनां अर्पण करणे म्हणजे त्यांना सांगणे आहे की "देवा! ह्या सर्वांपेक्षा तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, म्हणून हे सारे मी तुझ्या चरणी अर्पण करतो", आणि तुलाच मागतो
।। पै नाथ!आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे, आणि फक्त तूच तू उरावे।।
सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "सदगुरू" सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा, लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सदगुरुंना सांगून करायाची सवय असावी, सदगुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू, फुले व नैवैद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सदगुरुंना अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर सदगुरुंच्या सचेतन मूर्तिचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि. 'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी.
मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सदगुरुंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत,आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा, ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सदगुरुंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सदगुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं ,मीपणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं, त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही, हे रामनाम सदगुरुंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सदगुरुंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो.
मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास सांगतो इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेख आहे -ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व आणि असे गैर वर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये, नाही का? थोडक्यात आपल्या हातून सदगुरुंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे , मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत, असा भाव असला पाहिजे .मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे.
जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात षडरिपुच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल, आणि असे वागू लागलो कि आपला मीपणा आपोआप कमी होवून सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल.अशी मानसपूजा हि दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल.
मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे!
मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा.
आपल्याला शिवमानसपूजा किंवा देवी मानसपूजा परिचित असेलच. अशीच मानसपूजा सद्गुरूंचीही करावी.
।।गुरू गोविंद दोऊ खडे। काके लागू पाय।।
।। बलिहारी गुरू आपने। गोविंद दियो बताय ।। (संत कबीर)
सद्गुरू आणि देव दोन्ही समोर असता प्रथम सद्गुरूंच्या पाया पडावे कारण देवाची भेट घडवून आणण्याचे काम सद्गुरू करतात.
त्यात सद्गुरू जर परब्रह्म नित्यचिदानंद योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर गोष्टच वेगळी!
स्वामी म्हणजे चालता बोलता देव!
आपण रोज घरी देवपूजा करतो (?) खर तर उरकून टाकतो पण त्यात आपले मन क्वचितच रमते. नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती खर तर एक औपचारिकता झालेली असते. आपली स्वतःची भावना मात्र त्यात क्वचितच असते. आणि मी पूजा केली तेव्हा आता देवाने प्रसन्न व्हायलाच हवे आणि माझ्या ईच्छा पूर्ण करायलाच हव्यात हा व्यर्थ भावच त्यामध्ये अधिक असतो. पूजेच्या नावाखाली मूर्तीवर किंवा तसबिरीवर केलेले ते कोरडे उपचार असतात.
जेथे पूजेची ही अवस्था तेथे जप, नाम, अनुसंधान, ध्यान ह्या तर फारच दूरच्या गोष्टी.
वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजापण जमत नाही तेथे चित्ताची बैठक (स्थिरता) कशी निर्माण होणार?
सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे
असे जगद्गुरू तुकाराम महाराजही म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्गुण अवस्थेपर्यंत पोहोचण्याइतपत सातत्य आणि निष्ठा अभावानेच आढळते.
अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा! जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा!
परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते.
बाह्य कर्म पूजा करताना आपल्या समोर देवाची मूर्ती असते परंतु मानसपूजेत भगवंताचे अधिष्ठान स्वतःच्या हृदयात करायचे असते म्हणूनच पूजेची सुरूवात ही देवतेच्या ध्यानाने करावी. प्रथम ध्यान श्लोकाने महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे.
ध्यान श्लोक:
नमो स्वामीराजम् दत्तावतारम्
श्रीविष्णूब्रम्हाशिवशक्तीरूपम् ।
ब्रम्हस्वरूपाय करूणाकराय
स्वामी समर्थाय नमो नमस्ते ।।
("आदिगुरू श्री दत्तप्रभूंचे अवतार स्वरूप असलेल्या स्वामी महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो. आपण साक्षात श्री ब्रम्हदेव, श्रीहरी विष्णू आणि श्री महादेवांचे त्यांच्या शक्तिसहित असलेले एकत्रित स्वरूप आहात.
करूणेची मूर्ती असलेल्या परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो!)
देहरूपाने जरी महाराज या भूमीवर असले तरी प्रत्यक्षात महाराज म्हणजे चैतन्यस्वरूपच आहेत. गुरूपरंपरेचा उगमस्थान असलेले श्री दत्तात्रेय हे स्वामींमध्येच अंतर्भूत आहेत.
एकदा महाराज खासबागेत बसले होते तेव्हा स्वामींची लाडकी गाय भागीरथी आपल्या कल्याण असे नाव ठेवलेल्या वत्सासह तेथे आली. महाराजांनी लगेच आपल्या खडावा पायात घातल्या, हातात कमंडलू घेतले आणि कौपिनधारी स्वामी मूर्ती अवधूतरूपात आविष्कृत झाली. स्वामी अचानक म्हणाले, "अलख अलख माय गे!" जमलेले सगळे भाविक आनंदाने उभे राहून ते तेजस्वी रूप भावभक्तीने न्याहाळू लागले.
हिमालयातील साधूंनाही महाराजांनी असेच दर्शन दिले होते.
अनेकांना संततीचा आशिर्वाद देऊन जीवनिर्मिती करणारे ते ब्रम्हदेव आहेत.
भक्तांचे पालनपोषण करणारे ते नारायण आहेत. परम ज्ञानाचा उपदेश करणारे ते भगवान सदाशिव आहेत.
प्रकृतीसुध्दा जिच्या अधीन आहे अशी आदिशक्ती सुद्धा स्वामींमध्येच सामावलेली आहे. सर्व देवता आणि त्यांच्या शक्ति एकत्र सामावलेले त्यांचे उगमस्थान महाराज म्हणजे परब्रह्म चैतन्यच आहे. ही सर्व सृष्टीच त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तेच आपले जनक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात समस्त जीवसृष्टीविषयी अपार करूणाभाव आहे.
Tuesday, July 28, 2020
श्री दत्त संप्रदाय
![]() |
श्री गुरुदेव दत्त |
Monday, July 27, 2020
श्री दत्त संप्रदाय
Sunday, July 26, 2020
गुरुशिखर श्रीक्षेत्र गिरनार
![]() |
भगवान दत्तात्रेय यांचे स्थान असलेले गिरनार पर्वताचे जवळ जवळ ६० वर्षापूर्वीचे चित्र. याच्यात पर्वतावरील सर्व महत्वाची स्थान दर्शविली आहेत. |
Saturday, July 25, 2020
श्री दत्त संप्रदाय
Friday, July 24, 2020
श्री दत्त संप्रदाय
Thursday, July 23, 2020
पाटणादेवी
![]() |
पाटणादेवी चंडिका माता |
पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासुन नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ओढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.
मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत्त नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे
वाट्त नाही कही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.
अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातुन भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी
तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पोर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते.
आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणित आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.
देवालयाचा ईतिहास
पुर्वी भारतवर्षातील महाराष्ट विदर्भ, खान्देश भागामध्ये पाटणा (विज्जलगड) प्रांत ऎतिहासिक महत्वाचा होता. येथे पुर्वी यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे राज्य होते. त्यावेळी हे शहर ४-५ मैल लांबी रुंदीचे होते. शहराचे भोवती ऊंच पर्वतीय तट तसेच शहरांमध्ये निसर्ग सौंदर्य वाढविणारी अनेक वॄक्ष-वेली यामुळे हे शहर प्रेक्षणीय होते. शहराचे राजमार्ग विशाल असून दुतर्फा निरनिराळी फळझाडे लावलेली होती.
पर्वताचे ऊंच भागावर पाण्याचे टाके खॊदून नळाद्वारे शहरामध्ये पाणी पुरवठा केलेला होता. शहरामधील धातूच्या खाणी व पर्वतावरील निरनिराळ्या वनस्पतींमुळॆ हे शहर शालिवाहन शक काळापासुनच व्यापार, कला, विद्या, रहदारी व देवस्थान यासाठी खूप प्रसिध्द होते. त्यावेळी यादवांचे मांडलिक राजे यांनी वाघळी येथील सिध्देश्वर मंदिर (शके ९९१) बहाळ येथील शारदादेवी मंदिर (शके १९४४) व पाटणा येथील चंडिकादेवी मंदिर ( शक पुर्व कलिन स्थापना असलेले) शके ११२८ ही देवालये यादवराव खॆऊणचंद्र व गॊविंदराज मौर्य यांनी शके ११५० आषाढ ३० सूर्य ग्रहणावर पितृ स्मृती स्मरणार्थ लोकदर्शनास्तव खुली केल्याचा उल्लेख श्री संत जनार्दनचरित्रामध्ये आहे. त्यावेळी त्यांचे दरबारामध्ये उपमण्यु गोत्री देशपांडे यांचे मूळ पुरुष कृष्णदेव यांचेकडे व्यवस्थापन कार्य होते. त्यांना त्या प्रित्यर्थ चाळीस लहान लहान वाड्यांचे अधिपत्य भूमीसह देऊन देशपांडेपण दिले होते. ते पुढे त्याच ठिकाणी रहिवासाकरिता राहिल्यामुळे तो भाग चाळीसगाव म्हणुन ओळखला जावू लागला.पुढे शके १२१६ चे सुमारास अल्लाउद्दिन खिलजी एलिचपूर देवगिरी ( दौलताबाद ) कडे रामदेवराय यादवास कपटाने जिंकण्यास गेला. एकीकडून गुलबर्गा येथे स्थापन झालेली बहामनी शाही व दुसरीकडून दिल्ली मोगल साम्राज्य यात हा प्रांत अडचणीत सापडला. त्यामुळे पूर्वीच्या हिन्दु राज्याची धर्ममय प्रभावशाली राज्यप्रणाली जावून तेथे इस्लामी धर्मसत्ता शके १२१६ पासून आली. चतुवर्ण व सनातन हिंदू धर्म जर्जर झाला व सर्वत्र एकजात इस्लाम धर्माचे हिरवे निशाण फडकू लागले व हा प्रान्त नामशेष झाला.
चंडिका ( पाटणा) देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. ह्या शक्तिपीठाचे नाव वरदहस्त असे आहे. ह्या शक्तिपीठा संदर्भात कथा अशी आहे की, सतीचे वडील दक्षप्रजापती त्यांनी एकदा पुत्रसंतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. परंतु शिव – सतीस यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. कारण शिव-सतीचा विवाह वडील दक्षप्रजापती यांचे मनाविरुध्द झाला,ह्या विवाहास त्यांची संमती नव्ह्ती. हे एक यज्ञास न बोलविण्याचे मुख्य कारण तसेच शिवजीचे सर्वभक्तगण स्मशाणात राहणारे , चित्रविचित्र पोषाख करणारे, कफल्लक, अंगास भस्म फासणारे त्यामुळे ह्या डामडौलाच्या यज्ञ सोहळ्यात ह्या सर्वांचे प्रयोजन नाही असे कारण दाखवून दक्षप्रजापतीने शिव-सतीस निमंत्रण दिले नाही. भव्य अशा यज्ञ मंडपात यज्ञाची सुरुवात झाली. सर्व देव आपाआपला भाग घेण्यासाठी निमंत्रणाप्रमाणे आले हे पाहून नारदमूनी सतीस जावून भेटले. आपल्या रसभरीत मधुर वाणीने यज्ञाचे वर्णन सतीस ऎकवीले व विचारले की आपण अजून का गेला नाहीत. त्यावर सतीने आम्हास निमंत्रण नसल्याचे सांगितले त्यावर पितागृही भेटीसाठी व यज्ञाचे ठिकाणी दर्शनासाठी कुठ्ल्याही निमंत्रणाची जरुरी नाही हे युक्तीवादाने सतीस पटवून दिले. यज्ञाचे निमित्ताने गेल्यावर सर्वांच्या भेटी होतील. अशी इच्छा सतीने शिवजीस सांगितली. ही वेळ योग्य नाही ही गोष्ट शिवजींनी सतीस समजावीण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीहट्टापुढे तो जमला नाही. म्हणून त्यांनी सतीस एकटीने जाण्यास परवानगी दिली. सती नंदीसोबत यज्ञाचे दर्शनासाठी सर्व प्रथम पितॄगॄही गेली. त्या ठिकाणी जमलेल्या सर्व आप्तगणगोतांनी विनानिमंत्रण तू का आलीस असे हिनवून सतीचा अपमान केला. वादविवाद टाळून हा अपमान सतीने सहन केला. सती पुढे यज्ञमंडपाकडे निघाली तिथे गेल्यावर सर्व देवतेंचे भाग यज्ञपीठावर मांड्लेले सतीने पाहिले. परंतु महादेवाचा भाग त्या ठिकाणी नव्हता असा शिवजीचा अपमान योग्य नाही हे समजाविण्याचे प्रयत्न सतीने केला पण अभिमानाने व गर्वाने धूंध झालेल्या दक्षप्रजापतीस सतीचे म्हणणे पटले नाही. उलट शिवजी तुझे पती आहे त्यामुळे हे तु बोलतेस व त्याने सतीस तू यज्ञमंड्पातून चालती हो असे सांगितले त्यामुळे देवधीदेव महादेवासह आपल्या पतीचा हा अपमान सतीकडून सहन न झाल्यामुळे सतीने आपल्या पित्याकडून निर्माण झालेले शरीर हे य़ज्ञ मंड्पातच संपविण्याचा निश्चय केला. तिने आत्मशक्ती जागृत करुन शरीरातुन प्राण काढून घेतला व ती निष्प्राण झाली ही गोष्ट शिवजीस नंदीने जावून सांगितली. शिवजी खूप क्रोधीत झाले त्यांनी आपल्या जटा आपटून विरभद्र निर्माण केला व दक्षयज्ञाचा विद्ध्वंस केला व सतीचे शव दोन्ही हातात घेवून कैलासाकडे जावयास निघाले परंतु पत्नी वियोगाचे क्रोधामुळे तांडव नृत्य करु लागले. त्यातच त्यांचा तिसरा नेञ उघडला गेला व जो समोर येइल तो भस्म होवू लागला. अश्या ह्या संहारामुळे सर्वांचा विनाश होइल अशी काळजी सर्व देवांना पडली. त्यावळी सर्व देव भगवान विष्णुकडे शरण गेले ह्यावर काही उपाय योजना करावी अशी विनंती केली त्यावेळी भगवान विष्णुंनी क्रोधाचे कारण असलेले शिवजीच्या हातातील सतीचे शव नष्ट करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही हे लक्षात घेवुन आपल्या सुदर्शन चक्राने शिवजीच्या हातातील शवाचे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी त्या शवाचा तुकडा पडला त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले. मंदिरा मागील डोंगरावर भगवतीसतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडल्यामुळे त्या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाले. शक्तिपीठाची मुळ जागा डोंगराच्या उंच कडेवर आहे.भगवतीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी भगवतीची नित्य उपासना केली. वृध्दापकाळाने गात्र शिथील होवु लागले. त्यामुळे उपासनेत खंड पडेल ह्या विचाराने ते चिंतीत झाले. त्यावेळी एक अनुष्ठान त्यांनी केले त्यावेळी भगवतीने त्यांचेवर प्रसन्न होवून दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी भक्तांसाठी व स्वतःकरीत असलेल्या नित्य उपासनेसाठी भगवतीने उंच कडेवरुन खाली यावे अशी विनंती केली. आपल्या परमप्रिय भक्तासाठी ही विनंती मान्य केली. मी तुझ्या भक्तिपोटी तुझ्याबरोबर खाली येइल पण मी मागे येत असताना तु मागे वळून पाहू नये असे सांगितले त्याप्रमाणे भगवती आपल्या परमप्रिय भक्तामागे येवु लागली डोंगरकडा उतरुन आल्यावर गोविंदस्वामी धवलतिर्थ कुंडाजवळ येवून पोहचले व त्यांनी अल्हादकारक जलपान करुन आपली त्रुषा शांत केली पुढील मार्गक्रमणास सुरुवात करते वेळी त्यांना भोवळ आली व त्यातुन सावरताच त्यांना खूप मोठा कर्कश आवाज ऎकु आला. त्यामुळे ते भांबावून गेले व भगवती आपले मागे आहे किंवा नाही भान विसरुन त्यांनी मागे वळून पाहिले त्यावेळी भगवतीने त्यांना दर्शन दिले व त्याच ठिकाणी भगवती अदॄश्य झाली. घडल्या प्रकाराचे त्यांना खूप वाइट वाटले. पण ते दॄढ निश्चयाने ते त्या ठिकाणी मरणांत अनुष्ठानास बसले शेवटी भगवतीने त्यांना पुन्हा दर्शन दिले व सांगितले की मी तुझ्या मागे येणार नाही. तर तुला दिलेल्या वचन पुर्तीसाठी तू या कुंडात स्नान कर, स्नान करतेवेळी तुझ्या हातात स्वयंभू मुर्ती येइल ती तू घे व माझी स्थापना कर, अश्या रितीने स्नानानंतर गोविंद स्वामीच्या हातामध्ये पाषाणाची स्वयंभू मुर्ती आली. त्याच मुर्तीची स्थापना गोविंद स्वामींनी आजच्या चंडिकादेवी मंदिरात त्यावेळी केली.ह्याच मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिवमंदिर आहे. मध्यभागी विष्णू मंदिर आहे. तसेच गोविंद स्वामींनी आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड निरंतर भगवतीची सेवा केली व सेवा करत असतानाच वचन पुर्तीसाठी जिवंत समाधी घेतली त्यांची समाधी आज मंदिराचे पुढे आहे.
आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे वाटत नाही काही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.
अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातून भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवराञ महोत्सव व वासंतीक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पौर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते. भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या उद्देशपुर्तीसाठी प्रतिष्ठाण प्रयत्नशील असते. दर पोर्णिमेस प्रतिष्ठाणांमार्फत महाप्रसाद वितरण माध्यान्य कालीन पूजेनंतर केला जातो. तसेच न्यासाने यात्रीनिवास बांधण्याचे काम सुद्धा हाती घेतले आहे. आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणीत आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.
प्रेक्षणीय स्थळे
![]() |
नागार्जुन कोठी |
या लेण्याचा आकार प्रमाणबध्द नसुन व्हरांडा १८ फुट लांब, ६ फुट रुंद आहे. यास काही चौकोनी तर काही खांब षटकोनी आहेत.लेण्यासमोर एक खांब असुन त्यास सतीचा खांब अशी संज्ञा आहे. मूल होण्यासाठी चंडिकादेवीचे दर्शन घेउन नागार्जुन येथील सतीच्या खांबाजवळ नवस बोलला जातो व इच्छा पूर्तीनंतर त्या नवसाची सांगता देवीजवळ केली जाते. या खांबाची उंची सहा फूट आहे. आतील सभामंडप २० फूट * १८ फूट आहे. मध्यभागी दोन नक्षीकाम केलेले सुशोभित खांब आहेत. खांबाच्या दर्शनी भागावर अंबा व इंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.सभागृहाच्या आतील समोरील भिंतीला लागून कमळावर ध्यानस्थ बसलेल्या महावीरांची मूर्ती आहे. दोन्ही बाजुस दोन दिगंबर तीर्थकारांच्या मुर्त्या आहेत. वरच्या बाजूस दोन चौरी धारी सेवक आहेत. मकर व छत्र कोरलेले आहे. याच सभागृहाच्या पुर्वेकडील भिंतीवर एक ६ फुट उभी मुर्ती आहे हिच मुर्ती नवसाला पावते असा लोकांचा विश्वास आहे.
धवलतीर्थ
पाटणादेवी मंदिराजवळुन १ कि.मी. अंतरावर पायवाटेने गेल्यावर धवलतीर्थ हा धबधबा आहे. पावसाळ्यात उंचावरुन पडत असलेल्या पाण्याचे दृश्य खुपच मनमोहक असते. ह्याच ठिकाणी देवीचे आद्दउपासक गोविंदस्वामी यांना देवीचा साक्षात्कार झाला. देवीच्या पौराणीक कथेप्रमाणे देवी ह्याच ठिकाणी अदॄश्य झाली म्हणुनच आजही कुळाचारात अनेक भक्त पूजेसाठी येथे येवून देवीचे स्मरण करुन देवीचा तांदळा येथुनच घेवुन जातात.
पितळखोरा लेणि
पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्या आहेत.
उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.
![]() |
महादेव मंदिर |
केदारकुंड व केदारेश्वर
पाटणादेवी मंदिराजवळून २ के. मी.अंतरावर घनदाट झाडीमध्ये पायवाटेने चालत गेल्यावर बर्याच उंचावरुन पाणी पडत असल्याचे दॄश्य पावसाळ्यात दिसते. ज्या ठिकाणी हे पडलेले पाणी साचते तीच जागा म्हणजे केदारकुंड पाणी पडतेवेळी चे दृश्य मनाला आनंद देणारे व अल्हादकारक असते. येथूनच पुढे काही अंतरावर केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पुर्वी बुजले गेले होते. मद्रासी बाबा नावाच्या साधुने ते मंदिर माती काढुन मोकळे केले. जवळच पाण्याचे एक कुंड असुन त्यास नॆसर्गिक अश्या पायर्या आहेत. त्या ठिकाणी गणपतीची एक मुर्ती आहे ह्या गणापतीस उभा गणपती असे संबोधले जाते. ह्याच ठिकाणी मद्रासी बाबांनी मनःशांतीसाठी वसती केली. असे हे ठिकाण मनःशांतीसाठी उत्तम आहे.
![]() |
भास्कराचार्य
|
या महान गणितीचे आजचे पाटणादेवी हे जन्मस्थान आहे. अंदाजे इ.स.१११४ ते इ.स.११८५ हा त्यांचा कालखंड आहे.
![]() |
शून्याचा अविष्कार करणारे थोर गणिती श्री भास्कराचार्य |
जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, ते ठिकाण औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत आणि चाळीसगाव तालुक्यात पाटणादेवी या जागी आजही त्यांच्या नावाचा शिलालेख आहे.
![]() |
शॄंगार चावडी |
![]() |
वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर |
पाटणादेवी परिसर आज गौताळा अभयारण्यात जोडला गेला आहे. त्या ठिकाणी बिबटे, तडस, लांडगे,ससे,कोल्हे,मोर, माकड, रानडुकर व वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी व बिनविषारी सापांच्या जाती आहेत. ह्या सर्व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने अनेक कामे हाती घेतलेले आहेत. तसेच येथील परिसराच्या माहितीसाठी एक निसर्ग शिक्षण केंद्र चालु केले आहे.
॥ पाटणादेवीची आरती ॥
पाटणके चंडिके तुझा रहिवास डोंगरी हो।
नाना परीच्या वल्ह्या शोभा देती निरंतरी हो।
जाई जुई शेवंती प्रिती मोठी पुष्पावली हो।
दिवट्यांचे कल्लोळ आपण खेळे महाकाली हो।
आदिनाथ योगिनी चंडिका पाटण के स्वामिनी हो।
पर्वतावलोकनी भक्ता अभयवर देऊनी हो॥१॥
पितांबर नेसुनी पद्मासनी बैसली हो।
अंगीची काचोळी केशर बुक्क्यांनी भाळली हो।
वैजयंती हार गळा मोतीयाची जाळी हो।
नाकीचे सुपान चरणी घागरीया लोळती हो॥२॥
विप्रकुली जन्म झाला तैसा अवतार धरीला हो।
भक्तांचा देह अंश तिने उद्धरीला हो।
भक्ती तिचा देह विष्णू लोका प्रती गेला हो
भ्क्तांकित अभिमानी विष्णु दासाची माउली हॊ ॥३॥
चुनगच्ची मंदिर दुरुनी दिसतसे शिखर हो।
ध्यानस्थ बैसले ॠषी ब्राह्मण थोर थोर हो।
तीर्थाचा महिमा धवल तीर्थ उदक स्थिर हो।
ब्राम्हण सोडती मंत्र अक्षदा भक्त गर्जती जयजयकार हो॥४॥
॥ नित्योपासना ॥
॥ श्री देवीचा ध्यानमंत्र ॥
ॐ ऎं ह्रिं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥ (श्री चंडिकादॆव्यै नमो नमः)
ॐ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ सधिके ॥ शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते॥
ॐ नमो दॆव्यै महादॆव्यै शिवायॆ सततं नमः। नमः प्रकॄतै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् ॥
॥ श्रीसूक्तम् ॥
श्री गणेशाय नम:॥ श्रीमहाकालीमहालक्ष्मी महासरस्वती देवाताभ्यो नम:।
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ-वह॥१॥
तां म आ-वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥
अश्व्पूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्। श्रियं देवीमुपह्र्ये श्रीर्मां देवीर्जुषताम् ॥३॥
कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्। पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपव्ह्यये श्रियम् ॥४॥
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्देऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्व:। तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्याऽअलक्ष्मी:॥६॥
उपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिंना सह। प्रादुर्भूतोसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृध्दिं ददातु मे॥७॥
क्षृप्तिपासामलां ज्येष्ठांअलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृध्दिं च सर्वां निर्णुद्द मे गृहात ॥८॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्। ईश्वरीं सर्वभूतांनां तामिहोपव्हये श्रियम् ॥९॥
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि। पशूनां रुपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥
कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम । श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
आपः सृजन्तुस्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे । नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पदमालिनीम्। चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥
आर्द्रां यः करीणीं यष्टिं सुवर्णां हेमेमालिनीम्। सूर्यां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥
तां म आवह जात वेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम्॥१५॥
यः शुचि. प्रयतो भूत्वा जुहूयादाज्यमन्वहम्। सूक्तं पन्चशर्चं च श्रीकामः सततंजपेत॥१६॥
पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे। तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्य लभाम्यहम्॥१७॥
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने। धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे॥१८॥
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायतांक्षी। विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि संन्निधत्स्व॥१९॥
पुत्रपौत्रं धन धान्यं हस्त्यश्वादि गवे रथम् प्रजानां भवसी माता आयुष्यमंतं करोतु मे॥२०॥
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः। धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणोधनमश्विणौ ॥२१॥
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृंत्रहा। सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः॥२२॥
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्॥२३॥
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुककगंधमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवभूतिकरी प्रसीद मह्यम॥२४॥
विष्णु पत्नीं क्षमांदेवीं माधवीं माधवप्रियाम्। लक्ष्मी प्रियसखीं देवी नमाम्यच्युतवल्लभाम्॥२५॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥२६॥
श्रीवर्चस्वमायुऽमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥२७॥